Рет қаралды 48
१ जुलै २०२४ पासून भारतात नवीन कायदे लागू. मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक रहिवासीयांना नवीन कायद्याची दिली माहिती.
१ जुलै २०२४ पासून भारतात नवीन कायदे लागू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शन आणि आदेशाखाली १ जुलै २०२४ रोजी मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये तेथील स्थानिक रहिवासीयांना नवीन कायद्यांमध्ये आणलेल्या बदलची माहिती देण्या करिता एक कार्यक्रम राबिविला होता. ह्या मध्ये नागरिकांना नवीन बदलेल्या कायद्याची सर्व माहिती देण्यात आली ज्याने करून नागरिकांची फहसणूक होऊ नये.
नवीन कायद्यांना जुन्या कायद्यां सारखेच घेऊन चालायचे आहेत फक्त त्याचे सेकशन्स बदलले गेले आहेत असे सांगितले गेले आहेत. जसे भारतीय दंड संहिता १८६० कलम ५११ ह्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५८ (तीनशे अठ्ठावन ), फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४८४ (चारशे चौर्यांशी ) ह्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५३१, त्याच बरोबर भारतीय पुरावा कायदा १८७२ कलम १६७ (एकशे सदुसष्ट) ह्या ठिकाणी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ कलम १७० ही सुधारित कलमे लावण्यात आलेले आहेत.