Рет қаралды 483
#बैलपोळा निमित्त शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...... पोळा यायच्या पूर्वीच माननीय अधीक्षक अनुरागजी जैन यांच्या आदेशानुसार आमचे आदरणीय ठाणेदार संदीपजी कापडे साहेब पोलीस स्टेशन सावंगी मेघे जिल्हा वर्धा यांनी छान उपक्रम राबविलेला आहे. गावामध्ये जर सुव्यवस्था नांदवायची असेल तर ग्राउंड लेव्हलवर काम करावे लागते.त्यामध्ये आमचे ठाणेदार संदीप तिरमदास कापडे साहेब केव्हाही तत्पर असतात. गाडीमधून लाऊड स्पीकर च्या माध्यमातून पोळ्यानिमित्त नागरिकांना सूचना दिल्या आहे. कायदा सुव्यवस्थेच पालन करून बैलपोळा तान्हा पोळा कोणताही वाद-विवाद होणार नाही व जात धर्म पंथ पार्टी याचा विचार न करता मानव धर्माचे पालन करून सर्वांनी आनंद घ्यावा.दारू,जुगार, शिवीगाळ कोणीही करता कामा नये. याची दक्षता घ्यावी. चांगल्या प्रकारे पोळा साजरा करावा अशी सूचना देण्यात आली. त्यांचे अभिनंदन म्हणून दारूबंदी महिला मंडळ कुरझडी जामठा.दक्ष नागरिक फाउंडेशन, व ग्राम रक्षक दल, सर्वधर्मीय राष्ट्रीय प्रबोधनकार तुकारामदास घोडे महाराज, पोलीस पाटील धनवीज मॅडम, ग्रामसेवक राऊत मॅडम, व सर्वधर्मसमभाव गावकऱ्यांच्या वतीने ठाणेदार साहेबांना त्यांच्या कामाबद्दल मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या त्यांनी अशाच पद्धतीमध्ये लक्ष दिल्यास गुन्हेगारी कमी होईल असं वाटतंते. कारण संतांच सांगणं प्रेमाचं सरकारचं सांगणं दंडुक्याचं पर्यायाने दोघांचे ध्येय एकच आहे. समाज सुव्यवस्थेत नांदावा. अशाच पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचा मान ठेवून काम केले तर निश्चितच 26 जानेवारी 15 ऑगस्ट या गोष्टीचं महत्त्व वाढेल व गावामध्ये जबाबदार नागरिक निर्माण होईल शासनाच्या मंडळींनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये ज्यामध्ये जनतेचे हित आहे गरीब माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत माणूस जगला पाहिजे हीच भावना ठेवून काम करावं असे प्रतिपादन घोडे महाराज यांनी केले.
सर्वधर्मीय राष्ट्रीय प्रबोधनकार तुकाराम दास घोडे महाराज सर्वांनी बैल पोळ्याचा व्हिडिओ पहा सब्क्राईब करा लाईक व शेअर करा 9764099378