Рет қаралды 204
इसवी सन १६३६ साली निजामशाहीवर आलेले आदिलशहा व मुघल यांचे आक्रमण झाले. यावेळी झालेल्या युद्धात पराभव झाल्यावर निजामशाही कडून तह करताना. चावंड किल्ला शहाजीराजे यांनी मुघलांना दिला.
• इसवी सन १६७२-७३ साला दरम्यान छत्रपती शिवराय यांनी चावंडगड, हरिश्चंद्रगड,महिषगड, अडसरगड ताब्यात घेतले. व स्वराज्यात आलेल्या या किल्ल्यांचे नामांतर केले. यामध्ये चावंड किल्याचे नाव प्रसन्नगड ठेवले.
• इसवी सन १६९४ मध्ये औरंगजेब याने दक्षिणेत आल्यावर चावंड किल्ला जिंकला व किल्लेदार म्हणून सुरतसिंग गौड याची नेमणूक केली. परत हा किल्ला मराठ्यांनी जिंकला, त्यानंतर पुन्हा मुघलांतर्फे १६६५ साली गाजिउद्दीन बहादुर याने किल्ला जिंकला.असे वारंवार हा किल्ला मराठे व मुघल राज्यात फिरत राहिला.
• १० ऑगस्ट १७४९ साली चावंड हा किल्ला मुघलांनी हवालदार संताजी मोहिते यास मुघलांकडून सनदेत दिला गेला.
• पुढे हा किल्ला पेशवाईत आला. पेशवाईत असताना कैदी ठेवण्यासाठी या किल्याचा वापर केला गेला.नाना फडणवीस यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यास काही काळ कैद करून या किल्यावर ठेवले होते.
• इसवी सन १८१८ साली इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यावर संपूर्ण सत्ता इंग्रज राजवटीच्या ताब्यात आली. त्यावेळी इंग्रज अधिकारी मेजर एल्ड्रीजने चावंड किल्यावर २ मे रोजी हल्ला चढवला. यावेळी त्याने गडावर तोफ मारा करून जिंकून घेतला. व् गडाच्या पायरी मार्ग तोफेच्या माऱ्याने नष्ट करुन टाकला. तसेच गडावरील वास्तूंची हाणी केली.