Рет қаралды 102,395
गुरुवर्य डॉ जयवंत महाराज बोधले धामणगावकर पंढरपूर
अभंग - सत्य साच खरे | नाम विठोबाचे बरे
सत्य साच खरे । नाम विठोबाचे बरे ॥
येणे तुटती बंधने । उभयलोकी कीर्ती जेणे ॥
भाव ज्याचे गाठी । त्यासी लाभ उठाउठी ॥
तुका म्हणे भोळा । जिंकू जाणे कळीकाळा ॥
==============
तुकाराम महाराज म्हणतात की या संपूर्ण संसारात एकच सत्य खरे असून, साच असून ते आहे श्री हरि विठ्ठलाचे नाम, जे घेतल्याने मग मनुष्याचे येथील भावबंध तुटतात, मायेपासून त्याची सुटका होते आणि अंती त्याचा उद्धार होतो. ते म्हणतात एवढेच नव्हे तर विठ्ठलाचे नाम गायल्याने त्याची उभयालोकांत, म्हणजेच ह्या तिन्ही लोकांत कीर्ती देखील होते. परंतु त्यासाठी ठायी भाव मात्र शुद्ध हवा, म्हणजेच ते म्हणतात ज्या कोणाच्याठायी येथे श्री हरिविषयी शुद्ध भाव असतो त्यास हा लाभ उठाउठी किंवा तात्काळ लाभतो. त्याला त्याची प्रचिती हातोहात येते.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की अशारितीने नामस्मरण करणारा जरी कितीही भोळा असला तरीही त्याचा भाव मात्र उच्चप्रतीचा असल्याने तो काळाला देखील जिंकू शकतो, त्याला काळाला जिंकण्याचे तंत्र चांगलेच अवगत असते.
#जयवंतमहराजबोधले #jayawantmaharajbodhale #बोधराज #बोधवाणी #bodhwani
#पंढरपूर #dhamangaon #धामणगाव #आळंदी #alandi #प्रभाकरदादाबोधले #दादा #बोधले
#pandharpur #advocate #vedantacharya #मानकोजी #मानकोजीबोधले #परंपरा #कीर्तन #परंपरा #परमपूज्य #श्रीगुरू #जयवंतमहाराजकीर्तन
#रामायणामृत #भाग