Рет қаралды 41,498
#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha #शांतहोश्रीगुरुदत्ता #ShantHoShriGurudatta #karunatripadi
गायिका-सौ. कल्याणी कुळकर्णी आमलेकर
सौ.रसिका आमलेकर बावडेकर ,सौ. अश्विनी मेढेकर - साऊरकर,श्री. दत्तप्रसाद पांडे,रेणुका भृगुवार
तबला/पखवाज :श्री. चारुदत्त जिचकार
व्हायलीन : श्री.शिरीष भालेराव .
बासरी : श्री. अरविंद उपाध्ये.
सरोद :पुष्कर देशमुख .
ध्वनिमुद्रण : , मधुरिका स्टुडिओ, नागपूर.
अलबम: वासुदेव दत्त - अत्रि-पदी
वासुदेव संगीत सभा,'श्री वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
|| श्री श्रीमद् सद्गुरू संग ||
‘शांत हो श्री गुरुदत्ता | मम चित्ता शमवि आता’ कालातीत महिमा असलेले असे हे पद. हे अक्षरपद. हा दत्त परंपरेचा एक मेरूदंड होय. साक्षात करुणात्रिपदीच्या निमित्ताने एक अजरामर, म्हणजे ज्याच्या प्रभावाला वार्धक्य वा क्षीणता नाही व मृत्युच्या करालभयातूनसुद्धा मुक्तता करण्याचे सामर्थ्य ज्या पदाच्या ठायी विराजमान आहे असे हे साक्षात अद्वितीय अशा गुरूशिष्यांमधील ‘अक्षरसंवाद’ वा ‘उपनिषदीय सूक्त’ होय. भगवान दत्तात्रेय म्हणजेच साक्षात मेधा व रुतंभरा प्रतिभेचा निश्चय व कारुण्यमय असा अवीट संस्कार होय. निश्चय व महाकारूण्याची अधिष्ठात्री देवता जी दत्त, तीच जेव्हा क्रोधायमान होते, त्यावेळेला निर्माण होणारी प्रलयकारी परिस्थिती ही या तीन पदांची पार्श्वभूमी होय. दत्तपरंपरेला पुन्हा एकदा सुनिश्चित करण्यासाठी अनेक दंडक व यम नियमांच्या आधारे पूजा विधान सिद्ध करून थोरल्या स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर तसेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या पूजारी लोकांच्या हातात ते दिले व अत्यंत कडक अनुष्ठान व आत्यंतिक निष्ठेच्या जोरावर साक्षात दत्त चरणी समर्पित व्हावयास सांगितले; पण अवधानाने किंवा अनावधानाने वा गांभिर्याच्या अभावामुळे, साधनेतल्या त्रुटीमुळे, वारंवार होणार्या अक्षम्य चुकांमुळे एके दिवशी पालखी चालू असतांना उत्सवमूर्ति पालखीखाली आली. अतर्क्य घडले, अक्षम्य असे घडले, प्रायश्चित्त मिळणार नाही असे घडले. चूक समजली तरी सुधारली जात नाही हा मानवी स्वभाव आहे व इतिहास सुद्धा! भयामुळे, होऊ शकणार्या प्रलयामुळे व कोपामुळे, कंपित झालेली दत्तात्रेयांची राजधानी म्हणून गौरवली गेलेली अशी श्रीमन् नृसिंहसरस्वतीं स्वामी महाराजांची वास्तव्य वा पुण्यभूमी, धरणीकंपासारखी थरथरू लागली व त्यातील अभागी असे पुजारीजन अभयदानासाठी सद्गुरूंचा कोप व दाह ज्यांना समजेल व जे शांत करू शकतील अशा साक्षात सगुण दत्ताच्या म्हणजेच थोरल्या स्वामी महाराजांच्या शोधात निघाले. श्रीक्षेत्र नरसी येथे, कयाधूच्या काठी, चतुर्मासेनिमित्त मुक्कामी असलेल्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् थोरल्या स्वामी महाराजांच्याकडे अत्यंत व्यथित अंत:करणाने व अपराध क्षमेसाठी सर्व मंडळी पोहोचली. विषय अत्यंत गंभीर, गुर्वाज्ञेच्या उल्लंघनाचा व पूजा विधानाच्या अक्षम्य भंगाचा होता. पूजा विधानाच्या अक्षम्य भंगाचा विषय होता हा! अनेक वेळा अशा वेळा आल्यामुळे, अनेक वेळा अशा वेळा आल्यामुळे, व्यथित झालेल्या थोरल्या महाराजांनी सर्वांची कान उघाडणी तर केली असेलच असेल पण परत एकदा पुजारी मंडळींना त्यांच्या प्रारब्धाने दत्त पूजेच्या निमित्ताने आलेल्या भाग्याचे वर्णन केले, महत् भाग्याचे वर्णन केले आणि मग प्रत्यक्ष करुणेने महाकारुणीक दत्तात्रेयांची सर्वांच्याच वतीने अत्यंत करुणा रसामध्ये जी आर्ष रचना निर्माण केली, तेच हे महाकारुणीक पद. साक्षात सद्गुरूंचा दाह शांत करणारे, चित्ताला शांती देणारे, शिष्यांच्या वतीने अभय मागणारे व निश्चयपूर्वक अभय वचन घेणारे व कोप प्रलयाचा नाश करणारे असे हे पद होय. परमहंस परिव्राजकाचार्य थोरल्या स्वामी महाराजांची दत्तात्रेयांचे पदी व्यक्त झालेली ही त्रिपदी म्हणजे चित्त वृत्ती अंतःकरणत्रयी ने दृढनिश्चयपूर्वक परत एकदा गुरुचरणांचाच ठाम आधार घेण्याचा निश्चय होय.
शांत हो श्री गुरुदत्ता| मम चित्ता शमवी आता||
श्री गुरुदत्ता | जय भगवंता | ते मन निष्ठुर न करी आता ||
जय करुणाघन | निज जन जीवन | अनसूया नंदन | पाही जनार्दन ||
माझे जीवनच तू आहेस. निजजनजीवन म्हणजे साक्षात करुणामयी, करुणाघन दत्तात्रेयांचे असे हे वर्णन ह्या अखेरच्या पदाच्या निमित्ताने दत्तात्रेयांचा, सद्गुरूंचा कोप आणि दाह शांत झाल्याचे हे एक विलक्षण असं अभेदभक्ती चं उत्तम वर्णन करणारं असे हे पद होय. ही पदे सद्गुरूंना प्रसन्न चित्त करण्यासाठी, कोमल व करुणार्द्र दृष्टीसाठी केलेला धावा होय!
बस,
वासुदेवांचे चरण !