Рет қаралды 3,671
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.
समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे व्यवस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.
#दासबोध #manacheshlok #samarthramdas