Рет қаралды 31,708
#mahajanguruji #गुरूजी #महाजन #लक्ष्मीमातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला 'वरद लक्ष्मी व्रत' किंवा '#वैभवलक्ष्मीव्रत' असेही म्हणतात. हे व्रत करणाराच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि त्याला यश, सुख संपत्ति प्राप्त होते," असे म्हणून माताजीने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली.
वैभवलक्ष्मी व्रत तसे साधे सुधे व्रत आहे. परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात कीं सोन्याच्या दागिण्याची हळद कुंकु लावून पुजा केली कीं ते व्रत झाले. पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिण्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिण्याची विधी पूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच "वैभवलक्ष्मी व्रता" चे फळ मिळते.
"हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाराने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणी मनातल्या मनांत "जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता" असा जप करायचा. कोणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुऊन एक पाट ठेऊन त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर एक पाट ठेवावा. त्यावर धुतलेला एक स्वच्छ रूमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तु ठेवावी; आणि तीही नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी.
#लक्ष्मीमातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मीमाता 'श्री यंत्राने' च संतुष्ट होते. तेव्हा वैभवलक्ष्मी व्रत करणार्याने प्रथम 'श्री’यंत्राचे आणि लक्ष्मीमाताच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. त्यानंतर हळद कुंकू लावून पुजा करावी व लाल रंगाचे फूल वहावे. सांयकाळी घरी बनविलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी. ती बनविली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक अकरावेळा 'जय लक्ष्मी माता' असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्षांना घालावे. अशारीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच. या व्रताच्या प्रभावाने सर्वप्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात.