सोनोरीकिल्ला (मल्हारगड) स्वराज्या मधील सर्वात शेवटचा बांधलेला किल्ला

  Рет қаралды 288

VLOGALPHA

VLOGALPHA

Күн бұрын

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ’मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्वपश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धापाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बर्‍याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गढी, लक्ष्मी - नारायणाचे मंदिर, मुरलीधराचे मंदिर या पहाण्यासारख्या गोष्टी आहेत.
मल्हारगड हा छोटेखानी किल्ला, पानसे (वाडा) गढी, लक्ष्मी - नारायणचे व मुरलीधराचे मंदिर हि ठिकाणे मुंबई - पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.

Пікірлер: 9
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 76 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 17 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 875 М.
संतोषगडाचा इतिहास आणि सौंदर्य
25:52
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36