Рет қаралды 35
*शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024*🌹👌🙏🌴🚩🚩🥈
*गणेश चतुर्थी व्याख्यानमाला 2024*👌🚩🌹🌹🥈🌴
व्याख्याते..मा. बळीराम पोतदार सर
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ..
*सुसंस्काराची शिदोरी जीवन सुंदर बनवते.शाळांमधून मिळणारे शिक्षण आणि गुरुजनांकडून होणारे संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे खरे टप्पे आहेत. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःला सर्व टप्प्यांवर चौकस करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी टीव्ही, मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे. शिक्षण हे ज्ञानाने माणसाला समृद्ध बनवते. या समृद्धीच्या जोरावरच भविष्यातील प्रगती अवलंबून असल्याचे प्रतिपादन मा. बळीराम पोतदार सर यांनी यांनी पलूस येथे केले. येथील पंडित विष्णू दिगंबर पलु्सकर विद्यालयात अध्यक्ष उदयजी परांजपे साहेब सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवनिमित्त आयोजित व्याख्यानमाले प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक मा. तानाजी करांडे सर, आनंदराव सावंत,यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते*👌🌹🚩🌴🥈🥈.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमाले प्रसंगी चौथे पुष्प गुंफताना पोतदार सर पुढे म्हणाले की, सध्या सर्व क्षेत्रामध्ये करियर करण्याची खूप मोठी संधी आहे. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे, हे नक्की केले पाहिजे. सध्या शिक्षणाची विविध तंत्र उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांनी याचा आपल्या शैक्षणिक प्रवासात वापर करणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट केले. आभार संदीप सावंत यांनी मानले...