Рет қаралды 211
This video is all about the beautiful Chandreshwar Temple Chandwad & Renuka Mata Mandir
* श्री चंद्रेश्वर मंदिराचा पुरातन इतिहास *
आजपासून हजारो वर्षांपूर्वी जेव्हा गौतम ऋषींनी अहिल्या, इंद्रदेव व चंद्रदेव यांना शाप दिला, त्यावेळी चंद्रदेवाने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करुन शिवशंभूला प्रसन्न करुन घेतले. भगवान शंकर, माता पार्वतीने चंद्रदेवाला शापातून मुक्त केले. यानंतर चंद्रदेवाने येथील चंद्रेश्वर गडावर शिवलिंग स्थापन करून माता पार्वतीचीही स्थापना केली. तेव्हापासून चांदवडच्या या भव्य तेजस्वी शिवलिंगाला चंद्रेश्वर व माता पार्वतीला चंद्रेश्वरी या नावाने ओळखले जावू लागले. जमदानी ऋषी, रेणुकामाता, परशुराम यांच्यासह या धार्मिक पीठावर त्याकाळी अनेक साधू-संत, ऋषी-मुनी, राजे-महाराजे यांनी तपसाधना केली आहे. अशा या तिर्थावर आजही महाशिवरात्री निमित्ताने मोठा भव्य महोत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी | गडावर स्वर्गच अवतरल्याचा साक्षात्कार होतो. हजारो वर्षांपूर्वी राजा चंद्रसेनची राजधानी तामलिदापूर ही होती. त्याकाळची तामलिदापूर नगरी म्हणजेच आजची चांदवड नगरी होय. राजा चंद्रसेन भगवान शंकराचा भक्त होता. चंद्रसेन राजाने भगवान शंकर व माता पार्वतीचा आर्शीवाद मिळवून या ठिकाणी भव्य चंद्रेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली आहे.
विक्रम राजाला साडेसाती लागल्यानंतर विक्रम राजाने याच पुरातन चंद्रेश्वर मंदिरात येवून तपस्या केली होती. भगवान शंकराने प्रसन्न होवून राजाला आर्शीवाद देवून साडेसातीतून मुक्त केले. विक्रम राजाची तपश्चर्या पाहून राजा चंद्रसेनने आपली कन्या चंद्रकला हीचा विवाह या चंद्रेश्वर मंदिरात लावून दिला होता, पूर्वी जमदानी ऋषींचा आश्रमही येथेच होता.
परशुरामासह अनेक थोर तपस्वींच्या समाध्या आजही चंद्रेश्वर मंदिराच्या परिसरात आहेत. मुगल काळात औरंगजेबाने अनेक शहरातील मंदिरांची मोडतोड केली होती. येथील ऋषीमुनींच्या समाध्यांचाही यात समावेश होता. यानंतर बराच काळ हे पवित्र धाम असेच पडलेले होते. नागरिकांनी हे मंदिर शेणामातीने बुजवून सुरक्षित ठेवले होते.
सन ९९00 मध्ये दयानंदजी ९०८ स्वामी हे तिर्थयात्रा करत चांदवड शहरात मुक्कामी आले. दयानंदजी महाराजांना साक्षात्कारात भगवान शंकराने माझे शिवलिंग व मंदिर चिखलमातीत बुजले आहे. याचा जीर्णोध्दार कर, असे सांगितले, दयानंद महाराजांनी तीर्घटन थांबवून चंजेश्वर गडाकडे धाव घेतली व खोदकाम करून हे मंदिर चिखल मातीतून बाहेर काढले, घाच ठिकाणी तेजस्वी असे आकर्षक शिवलिंग व माता पार्वती (चंद्रेश्वरी माता) यांच्या मुर्ती सापडल्या.
ही वार्ता चांदवड शहरात पसरल्याने नागरिकांनी दयानंद महाराजांच्या मदतीने मंदिराचा जीणोध्दार केला. दयानंद स्वामींनी सुमारे चंद्रेश्वर भगवान व माता चंद्रेश्वरीची सेवा केली, आराधना करता करता त्यांनी या धार्मिक पीठाला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. शिवलींग | चंद्रेश्वरी मातेचे मंदिर ९९२० ते ९९८५ च्या दरम्यान बांधून त्याचाही जीर्णोध्दार करण्यात आला, 3383 साली स्वामींनी समाधी घेतली. त्यानंतर द्वितीय महाराज स्वामी विधानंद महाराज यांनी ६५ वर्ष सेवा केली. शादस्थान त्यांना ९३२४ साली महामंडलेश्वर ही पदवी साधू संतांनी कुंभमेळ्यात प्रदान केली. चंद्रेश्वरी मातेच्या मुर्तीची ज्यांनी पुनस्थापना करुन धव्य मूर्तीची स्थापना केली. या मुर्तीची मनोभावे पूजा अर्चा केली तर सर्व मनोकामना पूर्ण होते. विद्यानंद महाराजांनी 33 जानेवारी २००० रोजी समाधी घेतली, त्यानंतर स्वामी बन्सीपूरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी जयदेवपूरी महाराज येथील कारभार पाहतात, जयदेवपुरींनी विद्यानंद महाराजांची समाधी तसेच हनुमान मंदिराची निर्मिती केली. महाशिवरात्री तसेच श्रावणी सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणावर भक्त दर्शनासाठी येत असल्याने शासनाने या गडावर जाण्यासाठी खडीचा रस्ता तयार केला आहे. गोशाळा यात्रा निवास, सभामंडप यांचे काम केले आहे. स्वामी जयदेवपुरींनी तन-मन-धनाने अंतःकरणापासून विकास करण्याचा चंग बांधला आहे. पुरातन काळातील या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सध्या सुरु आहे.
Do watch my latest video
I hope you enjoyed it do like share and subscribe