Рет қаралды 206,425
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अगदी राज्याच्या विधानसभेपासूनच महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे पालटले आहे. गेल्या ६ महिन्यांत अगदी सुरुवातीपासूनच महाराष्ट्र भाजपच्या अनेक बड्या नेत्यांकडून वारंवार हे सरकार लवकरच कोसळेल असा दावा करण्यात येतो आहे. याच पार्श्वभूमीवर, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा दावा केला आहे.
"महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. या सरकारमध्ये प्रचंड विसंवाद आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळेल", असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया प्रचंड चर्चेत आहे. "भाजपमधून फुटलेले ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांची यादीच आमच्याकडे तयार आहे", असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
#Bacchu Kadu #Devendra Fadnavis #MahaVikasAaghadi #BJP #Maharashtra
SUBSCRIBE to HW News Marathi here: bit.ly/Subscrib...
Download the HW News Network free app available on Android and iOS: onelink.to/bpk42n
For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in
Connect With Us On:
→ Facebook: / hwnewsmarathi
→ Twitter: / hwnewsmarathi
→ Instagram: / hwmarathi.in
→ Telegram: t.me/hwmarathi/
→ Website: hwmarathi.in/