Рет қаралды 549,438
भविष्यात इंजिनियर होण्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते मात्र त्यांना १० वी नंतर काय करावे हे समजत नाही. ते डिप्लोमा आणि ११-१२ वी सायन्स यामध्ये गोंधळलेले असतात. त्यांचा गोंधळ कमी होऊन एक ठाम असा निर्णय घेता यावा यासाठी हा व्हिडिओ.
१२ वी (Science) नंतरचे फायदे आणि तोटे:-
फायदे :
1) १२ वी (Science) करून सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे सोपे असते कारण जागा जास्ती असतात.
2) खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे तर आणखीन सोपे होते कारण बऱ्यापैकी कॉलेजमधील CET मेरिट कमी असते.
3) JEE परीक्षा देऊन IIT / NIT मध्ये जाऊ शकतो.
तोटे
1) १२ वी नंतर चांगली नोकरी मिळणे अवघड होते.
डिप्लोमा नंतरचे फायदे आणि तोटे:-
फायदे :
1) डिप्लोमा नंतर लगेच नोकरी मिळू शकते.
तोटे:-
1) सरळ द्वितीय वर्षीसाठी प्रवेश मिळणे अवघड कारण जागा फक्त १०% असतात
2) जागा कमी असल्याने सरकारी कॉलेज ना प्रवेशासाठी ९८-९९% मार्क्स ची गरज लागेल आणि त्याच बरोबर खाजगी कॉलेज (जे ठीक आहेत) मध्ये प्रवेशासाठी ९०-९६% लागतात.
3) भारतातील मोठी कॉलेजेस IIT / NIT मिळू शकत नाहीत कारण तिथे JEE परीक्षा द्यावी लागते.