Рет қаралды 470
गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची ह्या कार्यक्रमाविषयीची थोडक्यात माहिती :-
'बासरीचे स्वर' असा शब्द उच्चारला तरी प्रोत्साहित,उल्हसित आणि शांत तृप्तीची प्रचिती देणाऱ्या लहरी प्रत्येकाच्या तनमनात गुंजन करत राहतात. रेंगाळतात.
'डमरुचा नाद ॑ हे शब्द ऐकले की स्वसामर्थ्याची , शिवत्वाची , आत्मविश्वासाची सजग जाणीव व्यक्तीमध्ये स्फुरण देणाऱ्या लहरींची ओळख जागृत करते .
भगवद्गीतेचे श्लोक शास्त्रशुद्ध , लयबद्ध पद्धतीने म्हटले वा ऐकले तर बासरी आणि डमरुच्या नादांची स्पंदने एकत्रित परिणाम घडवतात . हेच गीतागुंजन .
ह्या व्हिडियोमधले श्लोक ऐकून हा प्रत्यय आपल्याला घेता येईलच .
तैत्तिरीय उपनिषदानुसार प्रत्येक मानवाला जन्मासोबतच पंचकोश ( अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश किंवा food , vital , mental , intellectual and bliss sheaths ) प्राप्त झालेले आहेतच . तसेच जीवनविकासासाठी तीन पैलू ( aspects ) मिळतात. या पैलूंचा मागोवा कसा घ्यायचा ते भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ समजून घेतला की उलगडते . हीच भगवद्गीतेची पैरवी अर्थात् थोरवी वा महत्व.
जीवनात सामोऱ्या येणाऱ्या प्रसंग वा घटनांतून उद्भवणाऱ्या भावना जशा की नैराश्य , वैफल्य ( frustration ) ,
पेचप्रसंग ( crisis ) , डिप्रेशन , द्वंद्व , लोभ , क्रोध , गर्व , मत्सर इ. व्यक्तीच्या मनाभोवती करकचून वेढा घालतात , हतबलता येते . अशा कठीण प्रसंगी शरीर , मन आणि बुद्धी यांचा मेळ घालून या वेढ्यातून कसे पार जावे ह्याचे मार्गदर्शन करणारी पंचसूत्री भगवद्गीतेतील श्लोकांच्या अर्थातून गवसते . हीच तर गीतेची पैरवी . मग तयार आहात नं व्हिडियो बघून आपला प्रतिसाद द्यायला....
**गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची**