Рет қаралды 8,491
कोकणातील शेतकरी कधीही आत्महत्या करत नाही. कोकणातील लोक प्रामाणिक आहेत. त्यांच्याकडे चिकाटीही आहे. मात्र, त्यांच्यात केवळ दूरदृष्टी व ध्येयाची कमतरता आहे. शेती व मासेमारी व्यतिरिक्तही अनेक उद्योग कोकणात होऊ शकतात.कमी भांडवलात शेळी पालन, कुक्कुट पालन, गोपालन व दुग्ध व्यवसाय तसेच मत्स्यपालन यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करता येऊ शकतो
काळी मिरी, अर्थात एक मसाल्याचं पिक. कोकणातलं वातावरण या पिकासाठी अतिशय पोषक आहे. दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठानं या पिकाच्या लागवड आणि संशोधनावर बरंच काम केलंय. काळ्या मिरीचं पिक झाडावर उंच जातं. त्याची काढणी करणं अवघड जातं. यासाठी कृषी विद्यापिठातल्या तज्ज्ञांनी खास बुश पेपर वनस्पती विकसीत केली असून त्यावर काळ्या मिरीचं उत्पादन घेणं सोपं जातंय.
बुश पेपर वनस्पतीची लागवड करणं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय. काळ्या मिरीची लागवड करणं तसं सोपं काम आहे. या झाडाच्या सावलीत काळी मिरी अतिशय सहज वाढतेय. विशेष म्हणजे वेलींना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडत नाही.
काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. पण बुश पेपरमुळं काळ्या मिरीची उंची नियंत्रीत होऊन तिचं मुबलक उत्पादन घेणं आणि उत्पन्न वाढवणं सोपं जाणार आहे.
शपेपर वनस्पतीची लागवड करणं आणि तिचं संगोपन करणं कोकणात सोपं आहे. या आधार देणाऱ्या वनस्पतीच्या लागवडीसाठी फारसा खर्चही येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा प्रकल्प उत्तम पद्धतीने राबवू शकतो.
FOLLOW US ON FACEBOOK
/ stifan.pinto.3
FOLLOW ME ON INSTAGRAM
/ spinto_03
FOLLOW ME ON TWITTER
/ pinto_stifan