Рет қаралды 134,579
प्रेमाचं प्रतीक असलेला ऐतिहासिक ताजमहल आता द्वेषाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय. ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचं वादग्रस्त वक्यव्य भाजप आमदार संगीत सोम यांनी केलं. ताजमहाल बांधणाऱ्यांनी उत्तर प्रदेश आणि भारतातील हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम ही वास्तू देशद्रोह्यांनी बांधलेय असा सोम यांचा आरोप आहे. यावर प्रत्यारोप झाले नसते तरच नवल होतं. याविरुद्ध ओवेसींनी आपला आवाज उठवलाय. लाल किल्ला देशद्रोह्यांनीच बांधलाय, मग मोदी तिथे ध्वज फडकवणं थांबवणार का असा असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. विशेष म्हणजे, याआधी उत्तर प्रदेश सरकारनं पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने आधीच मोठा वाद पेटला आहे. दर्दैव असं की प्रेमाचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या या वास्तूवरून द्वेषाचं राजकारण व्हायला लागलं आहे. त्यामागची कारणमिमांसा
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive