Рет қаралды 653
वारी ,गणपतीची मिरवणूक, नेत्यांच्या सभा ,मंडळांच्या पूजा ,बेशिस्त वाहन चालकांमुळे झालेली ट्रॅफिक वा नैसर्गिक आपत्ती ….ऊन ,पाउस,थंडी कसलीही पर्वा न करता ,हर एक प्रसंगी ,दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस करून ,आपल्या सर्वांचं दैनंदिन जीवन सुरळीत चालावं म्हणून अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीसांकडे 'माणूस’ म्हणुन आपण एकदा तरी बघतो का?त्यांची पण घरी वाट बघणारी माऊली असेल ना? सणवारीला वाट बघत , झोपी जाणारं त्यांचापण कुटूंब असेल ना?त्यानं नसेल का वाटत की ,नको ही गर्दी,धुळ,हा आवाज ,नको ही मिरवणुक ,ट्रॅफिक , अन् हुल्लडबाजी करणाऱ्याना बेलगाम तरूणांवर रात्रभर पहारा देवून वठणीवर आणण्याची कामं..'आमच्या परिसरात रात्री पोलिस गस्त घालतात ,म्हणुन आम्ही निवांत झोपतो ',असं सहज म्हणुन जाणारे आपण एखादी वाईट घटना घडली की संपूर्ण पोलीस खात्याला सहज बदनाम करतो...कधी माणूस म्हणुन त्यांच्याकडेही बघूयात, कळेल की आपण ज्याच्यामुळे सदैव निवांत असतो तो महाराष्ट्र पोलीस अखंड ,अहोरात्र आपल्या सुरक्षेसाठी देवरूपाने तैनात असतो..म्हणूनंच ,समस्त महाराष्ट्राच्या जनतेकडून दंडवत ,मानाचा मुजरा ,महाराष्ट्र पोलीसांना !!!In Frame - @beiiideepikaa @its_nihiraConcept & Direction- @beiiideepikaa
video by :@photobykuldipbapat2658