Рет қаралды 6,587
#BolBhidu #BacchuKadu #ParivartanMahashaktiAlliance
मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथी घडल्यात. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले. त्यांनी भाजपसोबत महायुतीचं सरकार स्थापन केलं. मात्र बच्चू कडू नेमके कुणासोबत आहे? हे कोडं अजूनही महाराष्ट्राला सुटलं नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बच्चू कडू शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेले होते. ते महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले. आमचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचं ते सातत्याने सांगतायत. एकीकडे ते शिंदे आणि महायुतीसोबत असल्याचं सांगत असले तरी त्यांनी अनेकदा राज्य सरकारविरोधात भूमिका घेतलीय. आंदोलनं केलीत. अलीकडेच त्यांनी दिव्यांगाच्या प्रश्नासाठी मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन केलं होतं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार निवासस्थानाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी केली होती. तसेच यापूर्वी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना समुद्रात फेकण्याचा इशारा दिला होता. एकूणच बच्चू कडू यांची ही भूमिका पाहता, ते नेमके कुणासोबत आहेत, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता.
पण आता त्यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देत तिसऱ्या आघाडीची घोषणा केलीय. त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना सोबत घेत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केलीय. इतरही लहान मोठ्या पक्षांना आपल्या आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न बच्चू कडू करतायत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मोर्चेबांधणी करायला देखील सुरुवात केलीय. पण तिसऱ्या आघाडीच्या नादात बच्चू कडू यांचा सेल्फ गोल होऊ शकतो, असं बोललं जातंय. आता अशी चर्चा का होतीय, तिसऱ्या आघाडीमुळे बच्चू कडूचा खरंच सेल्फ गोल होऊ शकतो का? नेमके कोणते मुद्दे विरोधात जाऊ शकतात? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/