Рет қаралды 19,450
ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार राजू परुळेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने खोपोलीमध्ये एका भन्नाट आणि ऑफबीट विषयावर भाषण केलं. इतिहासाचा धांढोळा घेत सध्याच्या परिस्थितीशी त्याची सांगड घालत त्यांनी सत्यशोधनाच्या मार्गावर भारताला मार्गक्रमण करावेच लागेल असे ठामपणे सांगितले. गंगा जमुनी तहजीब जिने भारताचा जीडीपी हा 25 पर्यंत नेऊन ठेवला होता त्याच गंगा जमुनी तहजीबने भारतात बिर्याणी, बर्फ आणि असंख्य गोष्टी रुजवल्या. विविध दाखले देत राजू परुळेकर यांनी या क्लिष्ट वाटणाऱ्या विषयाचे इतके पैलू उलगडून सांगितलेत की ऐकणाऱ्याला हे नक्की वाटतं की 'अरेच्चा आपण असा कधी विचारच केला नव्हता'
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderpost@mediatheinsider.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.