जोहार . 🌳🌳🌱 ` *``~*2 जुलै~*```* *बारड गडा वरील* " पावस्या देवा चा कांबड नाच "🌞👯🏾♂️ पूर्वी आपल्या भागात पाऊस हा जूनच्या दुसऱ्या किँवा तिसऱ्या आठवड्यात यायचा त्यामुळें सर्व लोकांची पेरणी झाली की बारड डोंगराला कोली भाजी घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक वर गडावर चढतात सर्व एकत्र जमले की कांबड ना च करायचे. ज्या लोकांची भात पेरणी पूर्ण झालेली असायची ती च लोक कोली भाजी आपापल्या घरी खातात. ज्यांची अजून पेरणी बाकी असेल ती खात नाहीत कारण कोली भाजी खाण्याचा सण हा एकदाच करतात. पेरणी झाल्या नंतर जर पाऊस पडला नाही पेरणी झाली नाही, तर लोक समझायची की आपल्या गावातील लोकांकडून निसर्गा ची काही हानी झाली आहे, त्यामुळे आपल्या गावाला त्याचा कोप झाला आहे, त्या मूळे धोका निर्माण झाला असेल म्हणून आपल्यावर तो पावस्या देव रागावला असेल, म्हणुन पाऊस पडत नाही, आपली काय चूक झाली, आणि का आपल्यावरच पाऊस्या देव रागावला याचा माग घेण्यासाठी गावा गावातील काही भागत मंडळी, व जाणकार लोक च बारड गडावर चढायची आणि वरती कांबड नाच पाऊस पडे पर्यंत नाचायचे. काही काही वर्षी तर एक एक आठवडा लोक डोंगरावर राहायची कांबड नाचा साठी, प्रत्येक वर्षी जुलाई महिन्यातच बारड गडावर जातात कारण पूर्वी आपल्याकडे जो पाऊस पडायचा त्याची सुरुवात 12 -15 जून पासून व्हायची पण जर पाऊस नाही पडला तर वरील पावश्या देवा साठी कांबड नाच करून पाऊस पडण्या साठी लोक जुलै महिन्यात जात होती, यासाठी आम्ही गावातील पोर 2006 साल पासून दरवर्षी जायला केली होती पूर्वी आमच्या गावची लोकं जात होती पण date fixed नव्हती , 2006 ला हर्ष ग्रुप व नंतर युवा आदिवासी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून date fixed झाली तेव्हा पासून दरवर्षी आम्ही जायचे त्या वेळी आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम दरवर्षी राबवत राहीले पण पुढे 2011-12 च्या सुमारास फेशबुक सारख्या माध्यमातून पोस्ट मुळे बराच प्रचार झाला व 2 जुलै खूप प्रसिद्ध झाली आता खूप लाब लांब ची लोक यायला लागली . आता याला एक वेगळच वळण लागत आहे लोक आता याला' पोरांची जत्रा ' म्हणून प्रसिद्ध करत आहेत हे बरोबर वाटत नाही. बर पोरांची जत्रा ठीक आहे पण आपली संस्कृती चाली रिती नाही विसरले पाहिजे, आपण आदिवासी निसर्ग पूजक आहोत, हे कधीच विसरू नये . *आप रान उराडे* 6354955850बारडी ता. तलासरी जि.पालघर.