Рет қаралды 327,200
#BolBhidu #BeedLoksabha2024 #PankajaMunde
चौथ्या टप्प्यातलं मतदान होऊन त्याच विश्लेषणही झालं. पाचव्या टप्प्यातल्या सभा, प्रचार सगळ्याचा धुरळा पण उडायला लागलाय. पण चौथ्या टप्प्यात सगळ्यात हायव्होल्टेज झालेल्या बीडमधला राडा काही संपायचं नाव घेत नाहीये. मतदानाच्या दिवशी बीडमध्ये दिवसभरात ६५-६८ टक्के मतदान झालंय, असे आकडे ६ नंतर समोर येत होते. पण काल बीडमधली अपडेटेड फायनल आकडेवारी आली आणि ७० टक्क्यांसह महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतदान झाल्याचा मान बीडने मिळवला. इकडे शरद पवार गटाच्या बजरंग आप्पांनी मात्र काही मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी इनकॅमेरा फेरमतदान घ्यावं, अशी मागणी राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली.
थोडक्यात मराठा विरूद्ध वंजारी अशा थेट जातीय समिकरणांवर झालेल्या बीडच्या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी, एकवटलेला समाज आणि वाढलेली टक्केवारी यामुळे बीड पॅटर्नची चर्चा होतेय आणि आरोपही होतायंत. एकीकडे मविआवाले बीडमध्ये तुतारीच चालली, असा दावा करत असले तरी पंकजा मुंडे यांच्यासाठी बीडमध्ये एकवटलेल्या वंजारी समाजाने शांतीत क्रांती केली अशाही चर्चा चालू आहे. बीडमध्ये बॅकफूटला पडलेल्या पंकजा मुंडे अचानक फ्रंटफूटला कशा आल्या ? वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडली ? समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/