Рет қаралды 42,075
#BolBhidu #AjitPawar #MaharashtraVidhansabha
लोकसभा निवडणूक पार पडताच विधानसभांच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच बघायला मिळतोय. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पडतील, यासाठी सगळ्याच पक्षांकडून प्रयत्न केले जातायत. अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंकडून विशेष जोर लावला जातोय. आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे विधानसभेसाठी किमान ८०-९० जागा मिळतील, याची आम्हाला खात्री करावी लागेल. आम्हाला 80-90 जागा मिळाल्या तरच 50 पेक्षा जास्त आमदार जिंकून आणण्याची संधी आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. शिवाय शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्याच जागा आम्हाला मिळाव्यात. लोकसभेला कमी जागा घेतल्या, आता कमी जागा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती.
पण आता अजित पवार कमी जागा लढवण्यास तयार असल्याची माहिती समोर आलीय. जागा वाटपाशी संबंधित असलेल्या एका भाजपच्या नेत्यानं इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय. शिवाय राज्यात महायुतीची सत्ता आली तर उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळावं, या अटीवर अजित पवारांनी कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचं या भाजप नेत्यांनी सांगितलंय. पण लोकसभेला आधीच सपाटून मार खाल्ल्यानंतर आता कमी जागा लढवण्याची रणनीती अजित पवारांसाठी बॅकफुटवर घेऊन जाण्याची ठरू शकते. कमी जागा लढवणं, त्यांच्यासाठी कसं धोक्याचं आहे? यामुळे त्यांना कसा फटका बसू शकतो, पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/