Рет қаралды 77,738
समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.
दासबोध हा समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.
एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे.