Рет қаралды 87,943
Engineering Colleges चा फुगा कसा फुटला ? Engineer पोरांवर चहा विकायची वेळ कुणामुळे | Vishaych Bhari
साधारण दहा बारा वर्षापूर्वी महाराष्ट्रात किंवा एकूणच भारतात म्हणा, इंजिनीअरिंग क्षेत्रात खाजगी कॉलेजांना अगदी ऊतच आला होता. म्हणजे सध्या जस शासन 'मागेल त्याला शेततळे' ही योजना राबवत, तसचं त्या वेळी शासनाने मागेल त्याला इंजिनीअरिंग कॉलेज काढायची परवानगी द्यायची योजना काढली होती की काय, अशी शंका यावी इतक्या मोठ्या प्रमाणात ही कॉलेजेस निर्माण झाली होती. एका वर्षाची एका पोराची 30 हजारापासून 70000 पर्यंत फी. त्यावेळी त्या क्षेत्रात प्रचंड पैसा दिसल्यामुळे अनेक धनदांडग्यांना यामधे शिरावंस वाटलं...अगदी तालुक्या तालुक्यात कॉलेजेस निर्माण झाली. यामधे सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारणी लोकांचीच ही कॉलेजेस होती त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करून, इकडे फक्त पैसाच छापता आला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात, डोनेशनच्या नावाखाली अनेक लोकांकडून पैसे उकळले गेले...लोकांनी सुद्धा मुलांचं भविष्य चांगल होईल म्हणून लाखों रुपये यावर गुंतवले... अनेकांनी तर कर्ज काढून प्रवेश घेतले... दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडले आणि त्यांना वाटले की आता चांगली नोकरी मिळाल्यावर आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. पण मित्रांनो आज इंजिनीअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांला तुम्ही विचारलं, बाबा बरं चाललंय का तर त्यो पहिला डोक्याला हात लावून सांगतो, झक मारली अन इंजिनियर झालो. इतकी त्यांच्या नोकरीची परिस्थिती बिकट झालेलीय. त्यांच्याकडे पदवी आहे पण त्या पदवीच्या मदतीने नोकरी मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या उमेदवारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे आपल्या जवळ होते नव्हते तेवढे पैसे मुलाच्या शिक्षणावर खर्च करून सुद्धा मुलाला जॉब नाही, ठराविक काही लोकांना जॉब मिळाला तरी अगदीच तुटपुंजा पगार, यामुळे अनेक पालक सुद्धा धास्तावले. दरम्यान 'पुढच्याच ठेच, मागचा शहाणा' या उक्तीनुसार ही अवस्था बघून नंतर अनेक लोकांनी अभियांत्रिकी शिक्षणाला दुर्लक्ष केलं. मागच्या काही काळात सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा यांचा जसा एक मोठ्ठा फुगा बनला होता आणि नंतर तो फुटला तशीच गत इंजिनियरीगची पण झाली. जसे विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्साही राहिले नाहीत, तस तालुक्या तालुक्यात मोठमोठी कॉलेजेस थाटून बसलेल्या लोकांचं अर्थकारण बिघडल, परिणामी अनेक कॉलेजेस बंद पडली...मित्रांनो आजच्या घडीला जवळपास 80 ते 90 टक्के कॉलेजेस हे बंद पडलेली आहेत तर ज्यांनी लाखो रुपये खर्च करून, कर्ज काढून या गोष्टींचं शिक्षण घेतलं होतं त्यापैकी 80 टक्के तरुण हे बेरोजगार आहेत. काहींनी इंजिनियर मिस्त्रीच्या हाताखाली गवंडी काम, काही शेती, काही पशुपालन तर काही चहाच्या दुकानाची फ्रँचायजी घेऊन बसलेत. पण या परिस्थितीला कोण जबाबदारय, हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं घडलं, नक्की यामागे काय कारणे आहेत, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#whyengineeringcollegegetingclosed
#whyengineersareunemployed
#whyengineersarejoblessinindia
engineering colleges, engineering,autonomous engineering colleges,engineering college,malla reddy engineering college,nalla malla reddy engineering college,74 rural engineering colleges closed,student missing in malla reddy engineering college,malla reddy college of engineering,malla reddy engineering college students protest,malla reddy college of engineering and technology,self-financing engineering colleges,
why engineers are unemployed,why engineers are jobless in india,engineers are jobless,unemployed engineers,jobless engineers,why engineers are unemployed in india,why so many engineers are unemployed in india,engineer,jobless engineers in india,engineers,why engineers are jobless,how many engineers are jobless in india,why engineers are jobless?,why mechanical engineers jobless,unemployed engineers in india,why most engineers are unemployed in india