Рет қаралды 23,860
तळवाडे दिगर:- बागलाण तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या किकवारी खुर्द (यशवंत ग्राम) येथील सरपंच केदा बापू काकुळते यांच्या पत्नी कै. धनुबाई काकुळते यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ गावात एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला असून त्यात सर्वप्रथम निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर तथा शिवम सांस्कृतीक व आध्यात्मिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी कराड चे संस्थापक व मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच त्यांच्या स्मरणार्थ कृषीधन फाउंडेशन चे देखील उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून कृषिधन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या गावाचे प्रनेते बापू यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम उपस्थित नातेवाईका ना दोनशे अम्रवृक्षांचे वाटप देखील करण्यात आले. तसेच जगदीश पाटील यांनी शिवम प्रतिष्ठान यांना ५१ हजाराचा धनादेश देखील दिला.तसेच त्या प्रसंगी महाराष्ट्रातील थोर विचारवंत व्याख्याते इंद्रजीत देशमुख तथा वासूदेव देवानंद सरस्वती इंद्रजीत देशमुख यांचे आई या विषयावर व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलताना म्हणाले कि, आई कुठलही नाते निभवू शकते पण आईची जागा कुठलेच नाते घेऊ शकत नाही. तसेच उद्याच्या समर्थ भारत निर्मिती साठी आईची भूमिका यांनी व्यक्त केली. आई जिजाऊ मा साहेब भागासिंगाची आई आदी थोर क्रांतिकारी महिलांनी आई म्हणून आपल्या मुलांवर कशाप्रकारे संस्कार केले. एका आदर्श आणि ने आपल्या मुलावर कशाप्रकारे संस्कार करावेत आणि आजची आई याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी शिवम प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय पाटील,शिवम सदस्य कुमार घाडगे,प्रवीण क्षीरसागर, पोपटनाना महाराज, यांच्यासह पंचक्रोशीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत धोंडगे यांनी केले.