Рет қаралды 48,367
#BolBhidu #VidarbhaRainNews #MaharashtraRainUpdates
जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. मागील वर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने यावर्षी चांगला पाऊस पडेल अशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण सुद्धा झाल्या पिण्याच्या पाण्याची संपूर्ण वर्षभराची चिंता मिटली आहे पण याचीच दुसरी बाजू अशी आहे कि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र आहे. ऑगस्टमध्ये पावसाने सरासरी गाठल्यानंतर सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
सप्टेंबर महिन्यात देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याचसोबत येणाऱ्या काही दिवसात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आपण माहिती घेऊ की, येणाऱ्या काही दिवसांसाठी हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे याची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/