Рет қаралды 3,576
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्या नंतर सुद्धा काही भाग्यवंताना श्रीमहाराजांनी दर्शन दिल्याच्या काही नोंदी आपण श्रींच्या बखरीत वाचल्या असतीलच.
तसेच काहीसे या प्रसंगात घडले आहे. मुंबई येथील गिरगाव परिसरातील हे नाईक कुटुंब. फार पूर्वी पासून श्रींचे निस्सीम भक्त. केशवराव नाईकांना श्रीस्वामी महाराजांची फार भक्ती होती आणि एके दिवशी त्यांनी श्रीस्वामीना मुंबईतील अपल्या घरी जेवण्यास बोलावले. श्रीमहाराजांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि येण्याची वेळ, तिथी, वर सांगून लिहून ठेवण्यास सांगितले.
परंतु काही वर्षांनी केशवरवाना श्रीमहाराजांनी देह ठेवल्याची तार अकल्लकोटहून आली आणि केशवराव पार खचून गेले.
परंतु परब्रह्म श्रीस्वामी महाराजांनी दिलेला शब्द कधीच खोटा ठरणार नाही हे केशवराव जाणून होते.....आणि एके दिवशी असे काही घडले की केशवराव नाईकांचे आयुष्याचे सार्थक झाले.