Рет қаралды 765,930
नाशिक मध्ये रोडच्या विकासकामाचा कार्यक्रम नितीन गडकरी भाषणासाठी उभे राहिले, तेव्हड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा गडकरी भडकले.. पुढे काय घडलं पहा EXCLUSIVE VIDEO
नाशिक- मुंबई २ तास प्रवास, एकही आश्वासन खोटं होणार नाही, गडकरींची मोठी घोषणा गाड्यांचे हॉर्न बंद करून हे संगीत लावणार
#NitinGadkari #Nashik #Gadkari #ChaganBhujbal
कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात ‘रोडकरी’
कल्पकता आणि धाडसाचे दुसरे नाव म्हणजे नितीन गडकरी, असे म्हणत पालकमंत्री
विरोधकही रोडकरी म्हणतात
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यावेळी म्हणाल्या, नाशिककरांना गडकरी साहेबांची कायम प्रतीक्षा असते. तुम्ही येताना काही तरी घेऊन येतात. जाताना काही तरी देऊन जातात. संपूर्ण महाराष्ट्राला आपली मदत होते. रस्त्यांचे महत्त्व खूप आहे. पार्लमेंटमध्ये साहेब उभे असतात, तेव्हा विरोधक देखील साहेबाना रोडकरी म्हणून संबोधतात. आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या अजून मागण्या नक्की पूर्ण होतील. आर्थिक विकासाला गती देणारा महामार्गांचा विकास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संपूर्ण देश त्यांची वाट बघतो
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, आपण भूमितीचं पुस्तक चाळतो. त्यात त्रिकोण षटकोण सर्व सापडतं, पण भूमितीच्या पुस्तिकेत दृष्टीकोन सापडत नाही. तो गडकरी साहेबांमध्ये आहे. कुठला ही भेदभाव न ठेवता संपूर्ण देश माझा मतदार संघ आहे, असं ते म्हणतात. भारती ताई फक्त नाशिककर नाही तर, संपूर्ण देश त्यांची वाट बघत असतो. गडकरी साहेब एक विनंती आहे. मुंबई-नाशिक रस्त्यावर प्रचंड वाहतूक आहे. त्यामुळे इथं कायम खड्डे पडतात. तेव्हा नाशिक- मुंबई महामार्ग पूर्णतः सहा लेन करावा, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिकमध्ये गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकमधल्या मनोहर गार्डन येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी भुजबळांनी खास आपल्या शैलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कौतुक केले. भुजबळ म्हणाले, कल्पकता आणि धाडस याचं दुसरं नाव म्हणजे नितीन गडकरी. ते प्रगतीची स्वप्नं दाखवतात आणि ती साकार करण्याची क्षमताही ठेवतात. फक्त मुंबई-नाशिक रस्त्याची अवस्था वाईट झालीय. त्यामुळे गडकरी साहेबांनी पुढच्या वेळी मुंबईहून नाशिकला येताना कारने यावे. म्हणजे रस्त्यावर किती खड्डे पडलेत हे कळेल आणि त्याचं काय करायचं याचा निर्णय लगेच होईल. मात्र, आताही नितीन गडकरी रस्त्यांची घोषणा करतील आणि उद्याची हेडलाईन तीच असेल, असा विश्वासही व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे महाराष्ट्रात भरगच्च कार्यक्रम पुर्वनियोजित आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गडकरींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. नाशिकते - मुंबईचा प्रवास सध्याच्या घडीला ३ ते ४ तासाचा आहे. खड्ड्यांमुळे हा प्रवार ५ ते ६तासांचा झाला आहे. परंतु येत्या काही दिवसांत नाशिक-मुंबई केवळ २ तासांच पोहचता येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्यभरात अनेक विकासकामे, उड्डाणपुल, डबलडेकर उड्डणपुल बांधणार असल्याच्या घोषणा नितीन गडकरी यांनी केल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी नाशिकमध्ये विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, महाविकास आघाडीतील नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. येणाऱ्या काळात नाशिक ते मुंबई अवघ्या दोन तासांत पोहचाल असे गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच आपण खोटं बोलत नसून टेप करुन ठेवा यातील एकही आश्वासन खोटं ठरणार नाही असे रोखठोक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.
लाल दिव्यानंतर वाहनांचे सायरन बंद होणार
नितीन गडकरी यांनी लाल दिवे बंद केल्यानंतर आता देशातील वाहनांचा सायरनचा आवाज बदलणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे ध्वनी प्रदुषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे गडकरींनी सांगितले. रुग्णवाहिकांचे देखील सायरन बदलण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटलं आहे. आगामी काळात सायरनऐवजी लवकरच आकाशवाणीवर वाजणारी धून ऐकू येईल असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.