Рет қаралды 44,252
तर जयंत पाटील सभागृहाची माफी मागतील का ?
आ. जयकुमार गोरे ; एखाद्याचे करियर उध्वस्त करण्यासाठी गंभीर आरोप
छत्रपती शिवाजी एज्यूकेशन सोसायटीच्या हॉस्पिटलबाबत मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाचे पैसे हडपल्याचे जेष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी केलल्या आरोपाची चौकशी केली जावी, मात्र त्यांनी एखाद्याचे करियर उध्वस्त करण्यासाठी केलेल्या आरोपात तथ्य निघाले नाही तर ते सभागृहाची माफी मागतील का ? असा प्रश्न आ. जयकुमार गोरे अधिवेशनात उपस्थित केला. कोरोना काळात हॉस्पिटलकडे एक रुपया नसाताना स्वतःच्या खात्यावरील पैसे पाठवून पावणेचार कोटींचा निधी रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध करुन दिला होता असेही आ. गोरे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून शासनाचे पैसे हडप केल्याचा आरोप आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात केला होता. यावर स्पष्टीकरण देताना आ. गोरे म्हणाले, अर्थसंकल्पावरील मागण्यांबाबत सभागृहात चर्चा सुरु असताना जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी एज्यूकेशन सोसायटीच्या हॉस्पिटलवरुन माझ्यावर शासनाचे अनुदान लाटल्याचे वैयक्तिक आरोप केले होते. मी जुलै २०१९ मध्ये या संस्थेचा अध्यक्ष झालो. कोरोना महामारी आल्यावर एप्रिल २०२० मध्ये या हॉस्पिटलचा शासनाने म. फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल शासनाच्या ताब्यात घेऊन ते सुरु केले. त्यावेळी कोरोनाच्या फक्त शासकीय चाचण्या होत होत्या. जे रुग्ण शासनाच्या चाचणीनुसार पॉझिटिव्ह होते त्यांना रुग्णालयात भरती केले जात होते. हॉस्पिटलच्या नावावर त्यावेळी पैसे नव्हते. शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय माझ्या खात्यावरील पैसे पाठवून रुग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटल सुरु करण्यात आले होते. रुग्णांचे जीव वाचावेत म्हणून पावणेचार कोटी मी उपलब्ध करुन दिले होते. त्यावेळी कोरोना उपचारावरील कोणताही प्रोटोकॉल उपलब्ध नव्हता. डॉक्टरही उपचार करायला धजावत नव्हते.
आ. गोरे पुढे म्हणाले, सदर हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार घेतलेल्या ५८४ रुग्णांचे म. फुले जनआरोग्य योजनेतून एक कोटी ४६ लाखांचे अनुदान मिळाले होते. वस्तुस्थिती अशी असताना आ. जयंत पाटील यांच्यासारख्या जेष्ठ सदस्याने बिनबुडाचे आरोप केले. बोगस एमबीबीएस प्रवेशांचे आरोप असणाऱ्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी आरोप केले. मृत रुग्ण जिवंत दाखवून जर पैसे घेतले असतील तर चौकशी आणि कारवाई झालीच पाहिजे, मात्र एखाद्याचे करियर उध्वस्त करण्यासाठी त्यांनी आरोप केले आहेत. ज्यांना निवडणूक लढायची आहे त्यांनी लढावी, मात्र जयंत पाटलांनी सभागृहात काहीही बोलू नये. ते चालणार नाही. मृत रुग्ण जीवंत दाखवून एकाही रुग्णाचे पैसे घेतले असतील कारवाई करावी मात्र हे जर चुकीचे आरोप असतील तर जयंत पाटील सभागृहाची माफी मागणार का ? असा प्रश्नही त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित केला. यावेळी सभागृहात मोठा गोंधळही झाला.
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan #MLAJaykumarGore