Рет қаралды 139,675
#bbcmarathi #dalitinindia #castsystem #cremation
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सतरा हजार गावांमध्ये आजही सार्वजनिक स्मशानभूमी नाही. जमिनींची मालकी असणाऱ्यांना स्मशानभूमीची गरज फारशी लागत नसली तरी देशातील कोट्यवधी दलितांकडे आजही जमीन नाही. अशावेळी सार्वजनिक स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारासाठी जमीन मालकांची परवानगी घ्यावी लागते किंवा जिथे जमीन मिळेल तिथे अंत्यसंस्कार करावे लागतात.
सार्वजनिक स्मशानभूमीची सोय नसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वालवड गावातला हा ग्राउंड रिपोर्ट. यासोबतच बीड जिल्ह्यातील पालवण नावाच्या गावात सरपंच राहिलेल्या दलित महिलेच्याच अंत्यसंस्काराला का विरोध झाला? त्या गावातली परिस्थिती काय आहे? महाराष्ट्रातील दलित आणि भूमिहीन समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मांडणारा हा रिपोर्ट.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi