Рет қаралды 63,239
#BolBhidu #RamMandir #BhalchandraNemade
एका बाजूला राम मंदिरात होणारा प्रतिष्ठापना सोहळा काही दिवसांवर आलाय पण दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या चर्चा होतायत, ज्यांना वादाची किनार मिळतीये. आधी श्रीराम शाकाहारी की मांसाहारी हा वाद झाला, त्यानंतर शंकराचार्यांची उपस्थिती, राम मंदिराचं ठिकाण यावरुन झालेले वाद चर्चेत आले. पण आता एक नवीच चर्चा पुढं येतीये, रामायणाचे व्हर्जन्स म्हणजेच रुपांतरांमध्ये रामायणाबद्दल नेमकं काय लिहिलंय याचा. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी यासंदर्भात केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलंय.
जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना नेमाडे म्हणाले, 'आसाममधल्या करवी लोकांच्या रामायणात सीता मुख्य पात्र आहे. ती रामाला आज्ञा करते.' त्यांच्या या वक्तव्यानंतर रामायणाची वेगवेगळी रुपांतरं आणि त्याच्यात श्रीरामांचं आणि रामकथेचं रुप काय आहे, ही गोष्ट चर्चेत आलीये. पण जैन रामायण, करवी रामायण, महाराष्ट्रातलं अंकुश पुराण ही रामायणाची रुपांतरं आहेत काय ? त्यात नेमकं काय लिहिलंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/