Рет қаралды 336,039
#BolBhidu #Maval #MavalCrime
तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरलं, सोमवार दुपारची ही ब्रेकिंग न्यूज, ज्यामुळं फक्त मावळच नाही तर सगळ्या राज्यालाच धक्का बसला. कारण या तिहेरी हत्यांकाडात जीव गेला होता, एका महिलेचा आणि तिच्या ५ आणि २ वर्षांच्या चिमुकल्या मुलांचाही. त्यातही दुर्दैवाची गोष्ट ही होती, की या दोन चिमुकल्यांना इंद्रायणीच्या वाहत्या पात्रात जिवंतपणेच फेकून देण्यात आलं. कारण काय ? तर त्यांच्यामुळं आरोपींचं बिंग फुटू नये म्हणून. हे आरोपी करत काय होते ? तर या दोन चिमुकल्यांच्या आईचा मृतदेह पाण्यात फेकत होते, कशासाठी ?
तर आणखी एक गुन्हा लपवता यावा म्हणून. घरातून आजीकडे जाते असं सांगून निघालेली मुलगी, १५ दिवस झाले तरी घरी आली नाही, तिचा कुठला संपर्क झाला नाही, घरचे तिची वाट पाहत राहिले आणि त्यांना ऐकायला मिळाली, ती मुलीच्या मृत्यूची बातमी आणि नातवंडांच्या हत्येचीही. मावळमधलं हे संपूर्ण प्रकरण आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/