Рет қаралды 134,703
#BolBhidu #UddhavThackerayInMVA #RahulGandhiSangliSpeech
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झालीय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं आता राज्यात लक्ष घालायला सुरुवात केलीय. अलिकडेच राहुल गांधींनी सांगलीत सभा घेऊन एकप्रकारे प्रचाराचं रणशिंग फुंकलंय तर दुसरीकडं अमित शहांच्या महाराष्ट्र दौ-यात जागावाटपाबाबत खलबतं झाल्याच्या चर्चा आहेत. राहुल गांधींनी सांगली दौ-यावेळी तर तुम्ही बोलवाल तिथे प्रचाराला येईन, असं आश्वासन काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याच्या बातम्या आहेत. एकंदरीतच इतके दिवस शांत असलेलं राज्यातलं राजकीय वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झालीय. आता महायुतीत अजित दादा वेगळे लढतील अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येतायंत.
एकीकडं या बातम्या येत असतानाच आता महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चाचपणी करत असल्याच्या चर्चा आहेत. राहुल गांधींच्या सांगलीतल्या सभेला उद्धव ठाकरेंचं गैरहजर राहणं याकडेच बोट दाखवत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं आगामी काळात ठाकरे वेगळी चूल मांडू शकतात, असे संकेत मिळत असल्याचं सांगितलं जातंय. पण यामागची नेमकी कारणं काय, उद्धव ठाकरे वेगळं लढण्याच्या चर्चा का होतायंत आणि हे खरंच शक्य आहे का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/