Рет қаралды 103,986
#loksabhaelection2024 #thirdphasevoting #kolhapurloksabha #maharashtratimes
देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा ७ मे रोजी या तिसरा टप्पा पार पडला. या तिसर्या टप्प्यामध्ये देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्टात या टप्प्यात एकूण ११ जागांसाठी मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी देशात ६१ टक्के तर राज्यात सरासरी ५४.९८ टक्के मतदान झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये मतदान कमी झाले असून कोल्हापूरात सर्वाधिक मतदान झाल्याचे चित्र आहे. कोल्हापुरात झालेल्या या मतदानाचा कुणाला फायदा होणार याबाबत सखोल विश्लेषण