Рет қаралды 194,775
#BolBhidu #ShivrajSinghChouhan #Agricultureminister
९ जून २०२४ ला पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास ८ हजार पाहुणे उपस्थित होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्हा लोकांनी प्रचंड जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. पण, तसा जल्लोष इतर मंत्र्यांच्या शपथविधीवेळी मात्र पाहायला मिळाला नाही. राजनाथ सिंग, अमित शाह, जे पी नड्डा, निर्मला सीतारामन किंवा एस जयशंकर या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी कोणाच्याही शपथविधीवेळी जेवढा जल्लोष झाला नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त जल्लोष एका मंत्र्याच्या शपथविधीला होता. ते मंत्री म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान.
शिवराजसिंग चौहान ज्यांना मध्यप्रदेशात आणि देशभरात शिवराजमामा म्हणून ओळखलं जात त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळालं आहे. खरतरं २०१४ ते २०२४ अशी १० वर्ष कृषी मंत्री कोण होतं? अनेकांना त्यांची नावं माहिती नसतील. पण यावेळी मात्र हे खात ४ टर्म मुख्यमंत्री आणि ४ टर्म खासदारकीचा अनुभव असलेले शिवराजसिंग चौहान यांना देण्यात आलं आहे. या वरून पंतप्रधान मोदींची प्राथमिकता लक्षात येते. पण, शिवराज सिंग कृषिमंत्री असण्याचं नक्की किती महत्त्व आहे? त्यांना कृषिमंत्री करून पंतप्रधान मोदी काय सध्या करू पाहतायेत? आणि शिवराज सिंगच का? पाहूयात या व्हिडीओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/