Рет қаралды 23,454
#BolBhidu #AgniveerScheme #RahulGandhi
अग्निवीर योजना आणि त्यांच्या अवतीभोवती असलेले संशयाचे काळे ढग साफ होतांना दिसत नाहीयेत. अग्निवीर योजना लागू होऊन आता जवळपास २ वर्ष झाले आहेत. जून २०२२ मध्ये ही योजना लागू करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात आणि प्रामुख्याने बिहारमध्ये योजनेविरोधात हिंसक आंदोलन पाहायला मिळालं होतं. सरकार, संरक्षण मंत्री, सैन्यदल सर्वांनी याबाबत स्पष्टीकरण देऊनही तरुणांना ही योजना पटवून देण्यात सर्वांनाच अपयश आलं आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला होता.
लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी अग्निवीर योजेवर बोट ठेवत सरकारवर आरोप केले. ‘सरकार अग्निविरांना शहीद मानत नाही, त्यांच्या परिवारांना भरपाई दिली जात नाही’ असा आरोप राहुल गांधीनी संसदेत केला होता. त्यावर स्वतः संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर दिलं होतं. राहुल गांधी संसदेत खोटी माहिती देत आहेत असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं. पण, या सगळ्यामध्ये नक्की तथ्य काय? संरक्षणमंत्री राजनाथ सिंग खरं बोलतायत की विरोधीपक्षनेते राहुल गांधी? नक्की अग्निविरांना भरपाई मिळतीये की नाही? आणि या सगळ्या घटनेबाबत सैन्यदलाने नक्की काय म्हटलय? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/