Рет қаралды 17,494
#Jambharun #kokan #ratnagiri
कोकण आणि समुद्र हे समीकरण पहिल्यापासून रुळलेले आहे. पण त्यापलीकडे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेल्या कोकणाची एक वेगळी संस्कृती आहे.
.याच कोकणातले काही पट्टे असे आहेत ज्या पट्ट्यात आजही दाट जंगल आहे.
जांभरुणला जाणारा रस्ता असाच आहे.
दाभोळची खाडी ओलांडली की गुहागरवरुन शृंगारतळी अबलोली जाकादेवी मार्गे एक रस्ता जातो कोतावडेला याचा रस्तावर कोतावडेच्या अलीकडे ४ किलोमीटर एक छोटा फाटा आपल्याला घेऊन जातो जांभरुणच्या अद्भूत दुनियेत.
पण याआधी रस्त्यात लागतो तो भातगावचा पूल...
भातगावचा पूल हा बाव आणि जयगड नदीच्या संगमावर बांधलेला आहे. समुद्रापलिकडच्या कोकणाचे आगळेवेगळे दर्शन या पुलावरुन घडले. हिरवेगार डोंगर, मध्ये नदीचे निळेशार पाणी आणि त्यामुळे असलेला हा पूल डोळयाचे पारणे फेडतो.
भातगावचा पूल ओलांडून आम्ही जांभरुणच्या वाटेला लागलो. जांभरुण हे आडेवाटेवरचे गाव असल्यामुळे अर्थातच तिथे अजून फारसे चांगले रस्ते नाहीत. तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले असल्यामुळे जांभरुणला जाणारा छोटासा रस्ता गर्द आमराईतून जातो.
अगदीच तुऱळक अशी वस्ती आणि घनदाट झाडी यामुळे तुमचं जांभरुण गावाविषययीचे कुतुहल वाढलेले असतं.
रस्ता विचारत... चुकत मूकत का होईना... आम्ही एकदाचे... जांभरुण कॉटेजेसला पोचलो...
जांभरुणमध्ये पोचल्यावर तुम्हाला लगेचच दिसते ती पाखाडी.
अडीचशे वर्षापुर्वीची ती वाट तुम्हाला थेट सड्यावर घेऊन जाते
जिथे हजारो वर्षापासूनचा एक चमत्कार तुमची वाट बघत असतो.
जांभरुणातून सड्यावर आलात की सुमारे साडेतीन चार किलोमीटर तुम्हाला चालावे लागते. रमतगमत गेलात तरी ४० मिनिटात तुम्ही पोचता जांभरुण गावाचे प्राचीन पुराण सांगणाऱ्या एका प्रागैतिहासिक वारश्याजवळ...
कातळशिल्पांचा अनुभव अत्यंत भारावून टाकणारा होता. कातळावर कोरलेली ही काही चित्र तुम्हाला काही हजार वर्ष मागे घेऊन जातात.
मावळत्या सुर्यासमोरच आम्ही परतीची वाट धरली. सोबत आलेल्या दिपेशसोबत गावातल्या बिबट्याच्या गोष्टी ऐकत आम्ही मुक्कामी परतलो.
जांभरुण हे गाव जसं ऑफबीट आहे तसंच आनंद केळकर यांनी उभारलेली जांभरुण कॉटेजेस ही जागासुध्दा ऑफबीटच.
१९९७ साली आंब्याच्या व्यवसायानिमित्त केळकर इथे आले आणि इथलेच झाले. मुळात निसर्गाची आवड आणि समज उत्तम असल्याने केळकरांनी निसर्गाच्या मुळ गाभ्याला धक्का न लावता जांभरुण कॉटेजेसची जागा अजूनच फुलवली. जांभरुण कॉटेजची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. जांभरुणमधल्या कोणत्याही रानवाटेवर जायचं असेल तर इथूनच जावं लागतं.
कातळशिल्पांच्या साक्षीने सूर्य़ मावळल्यानंतर आम्ही जांभरुणच्या वाटांवर रात्री फिरायला पडलो. जांभरुणच्या जैवविविधतेचे जे कौतुक ऐकलं होतं त्याची प्रचिती लगेचच आली. भर रस्तात एक डुरक्या घोणस जातीचा दुर्मिळ साप दिसला. डुरक्या घोणस हा बिनविषारी असतो. त्यात तो मातीतून डांबरी रस्त्य़ावर आल्यामुळे बिचारा सुस्तावला होता.
आता जांभरुणचा मुक्काम खऱ्या सार्थकी लागला होता.
दुसरा दिवस उजाडला तो धनेशच्या आवाजाने. मलबार पाईड हॉर्नबील आंब्याच्या झाडावर बसून सगळ्या गावाला आवाजात साद घालत होता. धनेशाचे हे आस्त्विव जांभरुणची जैवविविधता दाखवत होती.
कातळशिल्पानंतर आता आम्ही बघणार होतो ती जांभरुणमधली जुनी मंदिरं. ही मंदिर साक्ष देतात की शेकडो वर्षापासून इथली माणसं नुसती नांदत नव्हती तर या मंदिरांच्या माध्यमातून स्थापत्यकला, श्रध्दा, धर्म, कुळाचार अगदी निगुतीने जपत होती. खऱ्या अर्थाने समृध्द होती.
जांभरुणात एकूण 5 मंदिरं आहेत. त्यातली 4 ही खासगी मालकीची आहे. गावातल्या शितूत कुटुंबियांच्या मालकीची ही मंदिरं आहेत. त्यांच्याकडूनच या मंदिरांची देखरेख केली जाते.
विष्णुचे पहिले मंदिर बघितल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे. दुसर मंदिर होतं ते श्रीकृष्णाचं. वाटेत एका ठिकाणी दिसला तो जांभरुणचा पॅनोरमा... डोंगरावर उतरलेल्या कोवळ्या उन्हात वनराईचा आमराईचा हिरवा पट्टा झळाळत होता.
डोंगरातून फिरवलेली पाखाडीची वाट उतरत गेलं लागतं जांभरुणातलं तिसरं मंदिर रत्नेश्वराचे मंदिर.
या मंदिरात महादेवाची पिंड आहे. महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो. सगळे शितूत कुटुंबिय इथे उपस्थित असतात. या मंदिराला रंगरंगोटी करुन छान निगा राखली होती. कोकणातल्या जाणवलेल्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता आणि इथे येणारी अनुभुती.... निसर्गाशी, तुमच् विश्वास असेल तर देवाशी, अशा ठिकाणी लवकर कनेक्ट होता येतं...अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग...
जांभरुणची पाचही मंदिर बघून झाल्यानंतर आता जांभरुणच्या सगळ्यांत वैशिष्ट्यपुर्ण गोष्टीकडे आपण वळणार होतो.
जांभरुण म्हणजे पाटपाखाड़ीचे गाव. त्यातली पाखाडी तर आपण पाहिली आता राहिला तो पाट... हा पाट म्हणजे जांभरुणची लाईफ लाईन आहे.
शेकडो वर्षापुर्वी आपल्या पुर्वजांनी डोंगऱ्यातल्या झऱ्यांना खेळवत गावात आणले. जमिनिच्या आणि पाण्याच्या लेव्हल ओळखत केलेला हा सगळा खेळ. या पाटातून बारा महिने पाणी वाहत असतं. याच पाण्यावर जांभरुणमधली वनसंपदा, पशुसंपदा ही आजही टिकून आहे.
जांभरुणची ओळख म्हणजे या गावातून बारा महिने वाहणारे झरे...
सह्याद्रीच्या सड्यांवर ४ महिने कोसळणारा महामूर पाऊस येथे कातळ पिऊन घेतात आणि झऱ्यांच्या रुपाने हे पाणी जांभरुणला देतात.
केळकर काकांनी दिलेल्या माहितीनुसार जांभरुणात जे झरे आहेत त्यातून वेगवेगळ्या लेव्हल २१ पाट काढलेले आहेत आणि गावातल्या सगळ्या घरांमध्ये हे पाणी पाटाने फिरवले आहे.
बरं हे पाट काही आत्ताचे नाहीत तर सुमारे अडीचशे वर्षापासून ते आहेत म्हणजे अडीचशे वर्षापुर्वी ज्या आपल्या पुर्वजांना ही कल्पना हे इंजिनिअरिंग सुचले असेल त्यांना नक्कीच दाद द्यायला हवी.
या पाटाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीत एक सुंदर डोह आहे. दुपारची वेळ, घनदाट झाडी आणि त्यात पुरुषभर उंचीच थंडगार डोह..
हा डोहात मनसोक्त डुंबलो आणि निघालो परतीच्या वाटेवर.