Рет қаралды 164,534
#BolBhidu #AnandDighe #SanjayRaut
१९८९ चा मार्च महिना, ठाण्यात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी घासून लढाई झाली होती, सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या महापौरपदाच्या निवडणुकीवर. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांचा एका मतानं पराभव झाला आणि ठाण्यातलं वातावरण बदललं. ठाण्यात सेनेची सगळी सूत्र आनंद दिघेंच्या हाती होती. हा पराभव म्हणजे त्यांच्या वर्चस्वाला मिळालेला हादरा होता. सगळ्या ठाण्यात गद्दार कोण ? याची चर्चा व्हायला लागली आणि अशातच शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. या हत्येच्या आरोपात, शिवसैनिकांसह आनंद दिघेंनाही अटक झाली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, टाडा अंतर्गत.
पण १९८९-९० मध्ये घडलेल्या प्रकरणाची चर्चा आत्ता का होतीये ? तर शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे. पण त्यावेळी ठाण्यात नेमकं काय घडलेलं ? आनंद दिघेंवर टाडा का लागला होता ? आणि या सगळ्यात संजय राऊत यांची भूमिका काय होती ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/