Рет қаралды 140,738
ज्यांनी स्वतःलाच स्वातंत्र्यवीर, वीर अशा पदव्या लावून घेतल्या! चित्रगुप्त या नावाने स्वतःचे आत्मचरित्र लिहून स्वतःचेच गुणगौरव केला.ज्यांनी अनेक वेळा दयेची याचना इंग्रजांच्याकडे मागितली आणि ज्यानी भारतातल्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी विचारधारा पोसली- वाढवली अशा वि.दा.सावरकर यांच्या चरित्राची आणि चारित्र्याची पोलखोल करणारे व्याख्यान आज निरंजन टकले सर यांनी कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत केले. खरंतर निरंजन टकले सरांनी काही वर्षांपूर्वीच द विक या प्रख्यात प्रसारमाध्यमांमध्ये lamb lionised ( शेळीचा जेंव्हा सिंह केला जातो )नावाचा सावरकरांच्या तथाकथित स्वातंत्र्यवीरपणाचा पडदाफाश करणारा लेख लिहिला होता. या लेखापेक्षाही विस्तृत मांडणी आज टकले सरांनी कोल्हापुरातील शाहू स्मारक भावनांमध्ये केली. यावेळी शाहू स्मारक भवन हे तुडुंब भरलेले होतं. एक ही व्यक्ती दीड तास चाललेल्या या व्याख्यानांमधून उठूनगेला नाही. तथाकथित स्वातंत्र्यवीराची लक्तरे ही टकले सरांनी कोल्हापूरच्या या शाहू महाराजांच्या भूमीत लोकांच्या समोर आणली. त्याबद्दल तमाम भारतीय त्यांचे कायम ऋणी राहतील .खरे तर वीर हा शब्द या सावरकरांना नाही तर निरंजन टकले सरांना शोभून दिसतो कारण आजच्या भयग्रस्त वातावरणामध्ये निर्भीडपणे सत्य मांडण्याचे आणि तेही पुराव्यासह मांडण्याचे धाडस निरंजन टकलेसर करतात! अशाच व्यक्ती वीर असतात! त्यांच्या या धाडसाला सलाम.