Рет қаралды 11,573
मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए. झालेल्या मिलिंद यांचे बालपण मुंबईत गेले. सामाजिक कार्याची मुळातच ओढ असल्यामुळे तरुण वयात अनेक चळवळींशी आणि सामाजिक विचारसरणी असलेल्या लोकांशी मिलिंद यांचा संबंध आला. आयुष्याच्या याच टप्प्यावर मिलिंद यांना महाराष्ट्रातील विक्रमगड-जव्हार या भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. लोकशाही मार्गाने आपले अधिकार मिळवण्यासाठी या भागातील ग्रामीण तरुणांना सक्षम बनविण्याचे महत्वाचे काम वयम् च्या माध्यमातून होत आहे. पुस्तके, वृत्तपत्रे यात विपुल लेखन करणारे मिलिंद थत्ते हे महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी सल्लागार परिषद या संविधानिक समितीत राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks