खानू पुणे जिल्ह्य़ातील पश्चिमेकडील शेवटचे गाव. या गावात मी एकदा निवडणूक कर्मचारी म्हणून काम केलंय. तेव्हा तेथे 125 मतदार होते. 95 मतदारांनीच आपला हक्क बजावला होता. माणसं खूप मोकळ्या मनाची. मी रवींद्र शंकर फरांदे, ओझर्डे ता. वाई जिल्हा सातारा. धन्यवाद. ❤❤❤❤❤❤
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@swapnilgaikwad68035 ай бұрын
खरोखरच डोंगर कपारीतील लोकं मोकळ्या मनाची असतात 👍
@amolpacharne32795 ай бұрын
महेश सर खूप खूप धन्यवाद
@ruparedkar63515 ай бұрын
काय बोलायचे शब्द ch नाहीत man sunna jhale आहे तुम्हाला Pranam 🙏🙏की आपन त्यांची व्यtha Sarvan समजावे म्हणून प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद देते आपणास धन्यवाद
मी संजय खडसरे आरोग्य सहाय्यक म्हणून काम केले आहे 2013 ते 2023 पर्यंत या गावात काम करत होतो माझ्याबरोबर श्री तांबोळी फिरोज हे आरोग्य सेवक म्हणून मागील सात वर्षे काम करीत होतो प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची सुविधा पुरवत होतो सगळ्या लहान मुलांचे लसीकरण शून्य वयोगट ते 10 वयोगटातील सर्व बाळां चे लसीकरण पूर्ण केले आहे एवढ्या खडतर आणि अवघड असणाऱ्या गावांमध्ये आम्ही दर महिन्याला येथील सर्व माणसांना आरोग्य सेवा पुरवत होतो माणसे खूप प्रेमळ आणि माया लावणारे आहेत आरोग्यसेवा
खडसरे तुमचं आणि तांबोळींच मनापासून कौतुक, आणि खूप खूप अभिनंदन. हे चित्र बघून मनात कालवाकालव झाली. मन सुन्न झालं. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांची सेवा केली. आत्ता इथे वास्तव्यास असलेल्यानां चांगल्या सुविधा लवकर मिळू देत ही परमेश्वरा चरणी प्रार्थना.❤❤
@vivekm79714 ай бұрын
@@amoljagtap3152Khar ahe Cement cha vikas krun khup dukh hote
@truptikulkarni2894 ай бұрын
Great
@PriyankaMore-cc7bl5 ай бұрын
मी सहसा कोणत्या व्हिडिओ ला कॉमेंट नाही लिहित पण आज तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप भावूक झाले खरंच ही पिढी संपुष्टात चालली आहे लहानपणी उन्हाळी सुट्टीत गावि जायचो आम्ही पूर्ण गाव भरलेलं असायचं आता शिक्षण नोकरी साठी बहुतेक लोकांनी मुंबईची वाट पकडली आहे त्यामुळे अशी निसर्गरम्य आपली गाव ओसाड पडत आहेत हे पाहून खूप दुःख होत आहे आणि ही जाणीव पण होतेय की डोक्यावर पदर ९ वारी साडी धोतर पेठा आणि हातात काठी आणि तोंडी पान आणि नातवंडांना बघून तोंडातून आपुलकीने पडणारे शब्द बाय लेका हे सारं काही अनुभव घेणारी आपण शेवटची पिढी आहोत या पुढील आयुष्यात ही आजी आजोबा असतील पण त्यांचं हे रूप मिळणं कठीण आहे.... आणि त्याची जाणीव होते तेव्हा हृदय पिळवटून निघत.....तो निरागस पणा चित्रपटातील गोष्टी खरी मानणारी विलन जेव्हा हिरो ला मारतो तेव्हा त्याला शिव्या देणारी अशी निरागस पिढी आता संपुष्टात येत चालली आहे........ तुझा हा व्हिडिओ पाहून खूप भावूक झाले....
@siraj313_5 ай бұрын
barobar bollat tumi dada
@vijyalaxmimuliya8705 ай бұрын
अगदी खर आहे. तुमचे करावे tewade तुमचे कौतुक व अभिनंदन कमी आहे. तुम्ही अजून भावना जपले
@dipakkhandagale88025 ай бұрын
👍
@TonyStark-yv7jt4 ай бұрын
😢😢😢😢
@S.More07254 ай бұрын
दादा हि कमेंट वाचून माझ्या आजी आणि आजोबा ची आठवण झाली.
@tanujapatil77695 ай бұрын
निवडणुका संपल्यावर सगळ्या नेत्यांना सुट्टी म्हणून या गावात नेवून सोडायला हव, वास्तविकता कळेल त्यांना पण...
@HarshaShejwal-k2h4 ай бұрын
Ho kharach
@raosahebchandanshiv4 ай бұрын
या मध्ये नेत्याची चूक नाही जर पैसे घेऊन मतदान करत असतील तर नेत्याचे काम सोपे जो पर्यंत वंचित समाज जागृत नाही होणार हेच चित्र पहावे लागेल श्रीमंत लोक गरीबI कडे लक्ष देणार नाही
@dp-yq3sn5 ай бұрын
फक्त वीस वर्षांच्या आत शहरातील दगदगीला कंटाळून सगळे निसर्गाच्या कुशीत पळतील 101%
@paayvata5 ай бұрын
अगदी 👍
@indrajitchavan11265 ай бұрын
144 कोटी लोकसंख्या आहे भाऊ भारताची सध्या, 20 वर्ष गाव राहूदे सरळ झाड तरी बघायला मिळतील का.....
@mm454545 ай бұрын
💯, मि स्वतः त्या मार्गावर आहे 🙏
@subodhsonawane26915 ай бұрын
ती बरोबर बोलला
@shilpa35445 ай бұрын
Barobar mi pan parat vichar kartey punha swata kasht karun jagayche City madhe khup swarthipana ahe Pan zade ani forest jya gantine nashta kartayt bagun bhiti vattyey
@santoshgolhe97265 ай бұрын
गावची माणस किती मायाळू असतात... बाबांनी ते फणस दिलं.... मन अगदीच भरून आलं यार.... खेड्यातील माणसं खरोखर देव माणसं असतात ❤
@vijayaghevade63424 ай бұрын
यांना काही मदत करता आली तर किती आनंद होईल. समाजात अजून खूप चांगली तरुण मुले, मुली आहेत त्यांनी मनावर घेतले तर, आणि अशा प्रकारच्या मदतीसाठी आव्हान केले तर, खूप सारी मदत, विविध प्रकारे करता येईल. आवडेल असे, गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचायला!🙏
@SanjhayPawar4 ай бұрын
मी संजय तानाजी पवार मु. आरफळ तालुका सातारा मी या गावात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिला मतदान अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यावेळेस आम्ही सर्व निवडणूक कर्मचारी डोंगरकडेने दोन तास पायी चालून नंतर गाव दिसले गावातील माणसे खुप प्रेमळ फक्त 95 मतदान झाले होते. मतदान काम झाले नंतर गाव सोडताना खूपच वाईट वाटत होते आज बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अविस्मरणीय आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत मी आपला खुप खुप आभारी आहे.❤❤
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@ajayshitkar82715 ай бұрын
शेवटी किती अपलुकिनी तो माणूस येवढं लांब गेला आणि फणस डोक्यावर घेऊन आला , ह्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे , जुनी लोक ती एक नंबर च आजकाल अशी माणुसकी कमी कमी होत चाललेली दिसते 🙏🏼
@SadhanaGhule-id7yi2 ай бұрын
@@ajayshitkar8271 कारण अशा प्रेमळ माणसांच्या माणुसकीची जाण आताच्या लोकांना राहिली नाही.जर आपल्यासाठी कोणी प्रेमाने काही केलं तर आपणही त्यांच्यासाठी प्रेमानं काहीतरी केलं पाहिजे अगदी निरपेक्ष भावनेनं जसं ते करतात.परंतु शहरातली बरीच लोकं स्वार्थी असतात.
@satishdighe834228 күн бұрын
त्या काकांना थोडी फार आर्थिक मदत करायला हवी होती.
@educationandcreativity19895 ай бұрын
Mi 2010 ते 2016 ...6 years as a teacher mhanun kam kel....Digewasti - khanu yethe. 6 years व्हिडिओ मधील व्यक्तींसोबत राहिलो . Rathod Sachin.
@dattadhindale80015 ай бұрын
इथला प्रत्येक माणूस पैशाने नाही मनाने खुप श्रीमंत आहे.. हे तुम्ही पण अनुभवल असेल दादा... आमची पण ह्या गावाला कोरोनाच्या काळातील भेट झाली आहे... इथल्या एका बाबांना मी एक प्रश्न विचारला होता कि बाबा तुम्हाला ह्या घरांच्या बदल्यात खाली शहरात जवळपास घर(थोडक्यात पुनर्वसन) दिले पाहिजे. तर ते मला म्हणाले नको रे बाबा आम्हाला किड्यामुंग्यासारख जीवन नाय जगायचं...
@paayvata5 ай бұрын
हो, वयक्तिक माझी देखील तीच धारणा आहे. हे जीवन सर्वात भारी असते त्यांच्या जगाकडून काहीही अपेक्षा नाहीयेत फक्त किमान पायाभूत सुविधा असतील तर त्यांना इतर ठिकाणची कधीच ओढ लागणार नाही आणि नसेलही... खरे शाश्वत जीवन तर तेच आहे
@mm454545 ай бұрын
@@paayvata 💯👍
@jagdishdevlekar13585 ай бұрын
फक्त परमेश्वराच्या कृपेने या माय बापांचे पाण्याचे हाल दूर होऊदेत हीच सदगुरु चरणी प्रार्थना..🙏🙏
@dattatrayabarkale76355 ай бұрын
निशब्द केलस मित्रा..... परीस्थितीने गांजलेली पण मनाने श्रीमंत असलेली शेवटची पिढी...
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sandipsonawane9763Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratibhasharma2731Ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagargorhe5 ай бұрын
2007 साली मी ह्या गावामध्ये गेलो होतो. Inter-Vida संस्थेच्या माध्यमातून...खूप लांब गाव आहे. आम्ही टेकपवळे गावातून चालत ह्या गावात गेलो होतो. ह्या गावाच्या शेजारील चांदर गाव पण खुप छान आहे.
@spore86175 ай бұрын
आमची फॅमीली अशा गावात कायमस्वरूपी जायचा विचार करत आहे, ह्या शहरी जीवणाचा आता कंटाळा आला आहे, शांत जीवण जगायचं असेल तर अशाच ठिकाणी जायला हवं
महेश खूप छान माहिती दिलीस...आज तुझ्यामुळं खर वास्तव समोर आल आहे...संघर्षमय जीवनात देखील समाधानान् सुख शोधणाऱ्या शेवटच्या पिढी सोबत भेट आज तुझ्यामुळे घडली आहे...धन्यवाद
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद मित्रा🙏
@tusharkdesai66585 ай бұрын
एक अनोळखी व्यक्ती आपल्या व्यथा ऐकून घेतल्या आपला पिण्याच्या पाण्याबद्दलचा संघर्ष जाणून घेतला...आपण काय तरी द्याव म्हणून त्यांनी आपुलकीने फणस तुम्हाला दिला ❤
@sagarphadnis38525 ай бұрын
😥😥गावाची अवस्था बघून खूप वाईट वाटलं आणि आजोबांनी किती प्रेमाने उन्हात चालत जाउन फणस आणले अशी प्रेमळ माणसे जपली पाहीजेत
@Labra1364 ай бұрын
गावच्या लोकांना खूप माया असते . शहरातली लोक बिझी वेळ नसतो त्यांना पण गावाकड गेलो तर कुठे बसवू आणि काय करु असे होते त्यांना गरिबाला माया असते हो .❤❤❤❤😊😊
@BhagwatJadhav-rl4ky5 ай бұрын
नलावडे यांचं खरच खूप आभार आणि ह्या लोकांन साठी येवढं करतात म्हणजे खरच खूप भारी माणूस आहे नाही तर आजकाल चे नेते कुठं येवढं कोणासाठी करतात
@sureshshelke30745 ай бұрын
मी अनेक दिवस अशाच दुर्गम गावाच्या शोधत होतो.खुप खुप आभार
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@NitiBiru5 ай бұрын
Suresh uncle apkli kahi sanklpana asel tar kalva maza pan sahbagh hoel
@DilDeshDuniyadari5 ай бұрын
काय संक्लपणा आहे कळेल का अम्ही पण जॉईन करू.
@TonyStark-yv7jt4 ай бұрын
Me khrach khup bhauk zhalo mazya dolyatun aashru aale 😢😢😢
खुप कष्टाचे पण साधे तितकेच नैसर्गिक जीवन व देण्यासाठी कायम हात वर असणाऱ्या पिढी ला मुकणार, नमस्कार या मन श्रीमंत देवांना 🙏🙏🙏
@Peaceful_life285 ай бұрын
खुपच अपरिचित गावाची माहिती मिळाली,ते ही पुण्यापासून फक्त 75 कि.मी. अंतरावर ही परिस्थिती आहे.
@greencityinternetcafe47755 ай бұрын
अतिशय दुर्गम भागातील कठीण वास्तव्य दाखवणारा व्हिडीओ किती समस्या येत असेल त्यांना जीवन जगताना या गावामध्ये .
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pavanrajyadav75635 ай бұрын
राजकीय कारकीर्दीत एकच माणूस भारी वाटला अमोल नलवडे
@rahulwaghmare89455 ай бұрын
जि प सदस्य मा श्री अमोल नलावडे यांनी दुर्गम भागात लोकांसाठी खुप कामे केलेली आहेत
@MahendraSarpate5 ай бұрын
मराठी संस्कृति जोपासण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे जय महाराष्ट्र
@madhurim.dhumal91723 ай бұрын
खर आहे राजकरणांनी खेळ झाला
@sambhajidevikar75735 ай бұрын
असं वाटलं नाही पुणे जिल्ह्यात पण एवढं दुर्गम गाव असेल म्हणून,किती माणुसकी आहे इथल्या लोकांच्यात.खूप छान व्हिडिओ बनवला भाऊ तुम्ही.
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@priyankanagvrkar13314 ай бұрын
Hya lokana madat kara khup vait vaatat
@sudamkurhade59835 ай бұрын
पायवाटा खरं आहे. अशी दिलदार माणसं भेटन दुर्मिळ. यालाच माणुष्कि म्हणायचे. भाऊ हा व्हिडिओ हिंदीत बनवा माणस कस जीवन जगतात. सरकार ला माहिती होऊ द्यावे. अच्छे दिन कि बुरे दिन.. हे पुर्ण देशाला कळु द्या.
@pratikadhawade83004 ай бұрын
अमोलशेठ नलावडे जिल्हापरिषद सदस्य ,कामाचा नेता ,1 नंबर माणूस
@balasahebmarkad78805 ай бұрын
पाहताना सर्व निसर्ग रम्य वाटतं ,पण ना रोजगाराच्या संधी, आणि आज खेड्यातील तरुणांना लग्ना वेळी कोणी विचारत सुद्धा नाही .....त्याचाच परिणाम म्हणून सर्व खेड्यातील कमी जास्त प्रमाणात अशीच अवस्था आहे. आणि होत आहे.
@sandhyabhate35535 ай бұрын
हे गाव पुन्हा आस्टित्वात यावे आणि बहरून जावे . शहरातील थोडी गर्दी इकडे आली तर ...हीच प्रार्थना. किती सुंदर निसर्ग आहेपण वस्ती नाही वाईट वाटते फणस पाहून आनंद झाला. किती दिलदार . ते आणून देणे किती मोठं मन त्या दादांचं... धन्यवाद हे वास्तव पाहायला मिळाले तुमच्यामुळे आली तर
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunilkoli3755 ай бұрын
महेश जी तुमचा प्रत्येक vlog जीवाला रुख रुख लावणारा, पूर्ण मन आणि शरीर आतून ढवळूण काढणारा असतो. प्रत्येक शहरात राहणाऱ्या ग्रामीण माणसाला तुमचे vlogs बघून आपलं इथे काहीतरी राहिलंय, काहीतरी हरवलंय.आपण शहरात कृत्रिम जीवन जगतोय याची जाणीव होत राहते.... खरंच गांव आणि गावपण सर्व हरवत चाललंय. तुम्ही आमच्या सारख्यांसाठी जिवंत ठेवताय, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rahulpagare21765 ай бұрын
खूप खूप खूपच सुंदर गाव आहे.तिथले घर,ते अंगण , अंगणात बसलेली आजी खूप छान आहे मलाही खूप आवडते असे गाव .मीही गावातच राहते पण आमचं गाव खूप सुधारत चालले आहे.माझ्या मुलीला ही खूप आवडतात अशी गावं ती फक्त १० वर्षांची आहे
@vijayatapkir82605 ай бұрын
खरंच खूप चांगली माहिती मिळाली, ग्रामीण भागातील वास्तव भयानक आहे, गावात काही सुविधा उपलब्ध नसल्याने लोक गाव सोडून गेले, जर शासनाने तेथे सुविधा उपलब्ध करून दिल्या तर लोक राहतील. सध्या या चार माणसांसाठी तरी काही तरी करा. माणूस मयत झाल्यावर होणारे हाल तर वाईटच, धन्य ती माणसं आणि त्यांचे प्रेम
@ShekharPawar-e6i5 ай бұрын
खूप भयान आहे. परंतु तरी पण एवढ्या जिद्धी नी राहणाऱ्या या लोकांना सलाम 🚩
@rameshsalvi88825 ай бұрын
छान चित्रण.. वेल्हे चां छान निसर्ग दर्शन झाले.. तसा हा तालुका जास्त पावसाचा म्हणुन ओळखला जातो.. पण आता भकास वाटला.. यंदा उन्हाने काहीली झालीय सगळीकडे.. चार घरांचं गाव पाहून आश्चर्य वाटलं.. मन व्याकुळ झाले.. कसे रहात असतील तेथील लोक...
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद
@pradeeprewale60894 ай бұрын
रविंद्र आपल्या कोकणात आडबाजूला अशी खुप गावे राहणा-या माणसांवीना कुलूपबंद आहेत. कितीही आपत्ती आली तरी हे खरे कुणबी घाटावरच्या क्वाॅलीस, सफारी मधे फिरणा-या मराठी शेतक-यांसारखे आत्महत्या करत नाहीत. धन्य 🙏 हे कुणबी.
@paayvata3 ай бұрын
👍
@MaheshKamble-s7e4 ай бұрын
खरच तुमच्या आजोबांनी लावलेल्या झाडाची फळे तुम्हाला खायला मिळणार हे एकूणच किती भारी वाटलं असेल तुम्हाला..😢😢
@kunalnangadepatil3795 ай бұрын
मी पण राजगड ( वेल्हा ) तालुक्यातला पण पहिल्यांदा नाव ऐकले या गावचे आणि तुमच्या मुळे पाहिले पण तालुक्यात अशी बरीच गावं आहेत कारण राजगड तालुका दुर्गम म्हणून ओळखला जातो तालुक्यातील अशी बरीच गावं असतील त्या सर्व गावांची भेट घेऊन त्यांना जगा समोर आण म्हणजे समजेल प्रत्येकला
@pralhadmhaskar26215 ай бұрын
एवढ्या खडतर परिस्थिती मध्ये जीवन जगणाऱ्या माणसांना कोटी कोटी प्रणाम, इथे जाण्याचा मार्ग सांगा दादा.
@kashinathjangam13875 ай бұрын
खूप मेहनत घेवुन बनवली फिल्म.धन्यवाद.लोकांसमोर परिस्थिती आणली.आणि नलावडे यांच्या सारखे लोकसेवक आहेत हे बघून अप्रुप वाटते.
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anantwakure-ek5gr5 ай бұрын
महेश चांगली माहिती दिली. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. कॉलेजच्या सहली इत्यादी माध्यमातून आपण अशा दुर्गम भागातील गावांना सर्वांनी भेट देऊन काहीतरी करायला पाहिजे
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद, नक्कीच 👍
@dineshmahajan58715 ай бұрын
भाऊ तुम्ही खूप चांगलं काम केलं ज्याप्रमाणे तुमच्या आजोबा या गावातले होते त्याप्रमाणे या गावातील इतर लोकांनी देखील या गावात वर्षातून एकदा का होईना भेट द्यावी आणि त्या भागातील सरकारी यंत्रणांना माझी विनंती आहे कृपया अशा गावाकडे लक्ष द्यावे त्यांना पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील याची जान ठेवावी
@shivshankarbachewa1115 ай бұрын
आम्ही व आमचे मित्र . . . या परिसरात नोकरी केली . . खरचं याच परिसरात सहयाद्री सारख्या मोठया मनाची माणसे येथे राहतात . . खरे जीवन जगण्याची कला आम्ही येथेच शिकलो . खानूप्रमाणे घोल . दापसरे ही गावे देखील आम्ही २००७ साली निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान केल्याचा सोहळा याची देही याची डोळा पाहिले . .
@ravinakambli94745 ай бұрын
या जुन्या पिडीचा ठेवा आपल्यालाच सांभाळायचा आहे आणी त्यासाठी सरकारने यात लक्ष घातलेच पाहिजे गावाखेड्यात जाऊन तिथली परिस्तिथी पाहून मदत केली पाहिजे मुलांसाठी शाळा तरुण वर्गाला रोजगार म्हाताऱ्या लोकांसाठी डॉक्टर हॉस्पिटल यावर काम झाले पाहिजे त्यात light पाणी सिलेंडर हे आहेच पण खर्च आपली गाव संस्कृती आणी जुनी मानस आपणच जपली पाहिजे❤
@kalyanikamble59815 ай бұрын
Ho agdi barobar aahe dada tumch juni mans tyana japla pahije te aahet mhanun apan aahot khara tar tumhi khupach changla kama karat aahat ya madhe ankhi loka aek houn aale pahije apli sunskruti japli pahije khup Khup dhanywad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
@pravinzagade57405 ай бұрын
घोल मध्ये मी सोलर चे काम केले होते...इथले लोक खूप स्ट्रगल करत जगतात...ज्यांना थोड कमी पडलं की ओरडतात त्यांना तिथं २-३ आठवडे सोडलं पाहिजे, म्हणजे समजेल आपण किती सुखात राहतो.
@ambarshinde10364 ай бұрын
2019 ला मी गेलो होतो खानु ला, तेव्हा बरेच लोकं होते, दिघी वस्ती च्या सरपंचांनी स्वतः जेवण बनवून खायला घातले होते....जबरदस्त माणस ❤
@anilgamre92015 ай бұрын
खुप ह्रदयद्रावक सत्य! आपण एकविसाव्या शतकात आहोत हे त्रिकालाबाधित सत्य स्विकारण क्लेशदायक आहे! खुप छान व्हिडिओ! पाहून माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या! आभार
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rahulbhosale19005 ай бұрын
खरंच., किती साधी,सरळ,समाधानी माणसे आहेत. नलावडे सर यांचे विशेष आभार.
@vijayjoshi495 ай бұрын
माझ्या गावाचे नावही खानूच आहे. पण ते रत्नागिरी पासून २५ किमीवर मुंबई- गोवा महामार्गावर वसलेले आहे. सुमारे 2000 वस्तीचे लहान से गाव आहे. हे सर्व पाहिल्यावर आम्ही किती सुखात आहोत हे समजले.
@vilasbomble68095 ай бұрын
Hatkhmba
@ViP_08-cp7cv5 ай бұрын
Yes,Math aani Pali gavchya madhomadh aahe.
@ashokjadhav38475 ай бұрын
आपण वेल्हे तालुक्यातील गावे दाखवता खूप छान वाटत अगदी अशा दुर्मिळ खेडोपाडी शिवकालीन पर्यटन स्थळ आहेत .
@kailaspawar83842 ай бұрын
आज बघुन खुप छान वाटले. शहरातील गजबजलेल्या वातावरणात राहुन दगदगीचे जीवन झाले आहे.मला खेंडे गाव खुप आवडतात सगळे कसे छान असते हवा स्वच्छ निर्मळ असते. ह्या गावाला कसे जायचे माहिती दिली तर फार बरे होईल. खुप छान माहिती आहे उपलब्ध करून दिली आपले मनापासून आभार धन्यवाद..! 🙏
@suchitapanchal-z1r5 ай бұрын
किती गावातील माणसे प्रेमळ. आजोबानी लावलेले फणस मिळाले नातवाला
@satyawanrane12452 ай бұрын
मला गावाची कथा ऐकून मी खूपच भाऊक झालो, धन्य ती माणसे , अंगावर आलेले शहारे अजूनही थांबत नाही. गावाची कथा ऐकून डोकं सून्न झाले. मित्रा तूला खूप खूप धन्यवाद 😢😂
@paayvata2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@PritiChavan-s5n4 ай бұрын
आजोबांचे प्रेम पाहून मन गहिवरून आले. शहरात एवढं प्रेम नक्कीच शोधून सापडणार नाही. ❤
@sharmishthapathak74815 ай бұрын
विहीरीच्या आजूबाजूला किंवा तिथे जिथे शक्य असेल तिथे जर मोठे खड्डे खाणले तर पावसाचे पाणी जीरून विहीरीला पाणी राहील पाणी फाऊँडेशन किंवा अशा अनेक संस्था अशी कामे करतात त्याना ईथे काम करण्याची संधी द्यावी म्हणजे त्याच्याही कामाचे सोने होईल आणी गावातील लोकांनाही पाणी मिळेल
@madhavdarekar87354 ай бұрын
उत्तम माहिती हृदय पिळवटून टाकणारी.मुलांनी गावाकडची ही अमूल्य आशि नैसर्गिक संपतती जपली पाहिजे.आणि आपल्या आई वडील.यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे
@sachindongre885 ай бұрын
14:35 बाबांनी खूप भावनीक केलं एवढं निरागस प्रेम फक्तं ग्रामीण भागात च मिळू शकते..... "फणस घेऊन जा थोडी गाडी थांबवा, मी घेऊन येतो अं्" बाबा ❤ तुमच्या शब्दांनी मन भरुन आले
@sweetsanvi28245 ай бұрын
मला खूप वाईट वाटले सगळे बघून... त्यांना साधं पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही.. राहतात ते घर पडकी आहे पण मंदिर मात्र पक्क आहे... देवाला सुद्धा दया येऊ नये😡
@brs57675 ай бұрын
आता ते सर्व गावकरी मुख्य प्रवाहात आले.सर्वच दुर्गम भागातील लोकं आता मुख्य प्रवाहात आले आहेत. शाळांसाठी मुलं मिळत नाहीत.प्रगती झाली !!!!
@narendrakumarpatil51475 ай бұрын
आजोबाच्या हाती लावलेल्या झाड़े,त्यांचे फळं खायलं मिळाले ।देव पावले तुम्हाला।
@vishalchavan80185 ай бұрын
या गावाला अर्थसहाय्य निधी उपलब्ध करून दिली पाहिजे सरकारने.ह्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे आणि सरकाराला ह्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आण्याची जबाबदारी आहे च... मूलभूत सुविधा करून द्या गावात सर्व गावकरी पुन्हा येतील
@MdKk786-i7y5 ай бұрын
पौर्णिमेच्या रात्री माळरानावर बसायला किंवा अंगनात झोपायला खूप मस्त वाटते. डांबावरच्या लाईटमुळे चंद्रचांदन्यांच्या प्रकाशात असणारी मन प्रसन्न करणारी शीतलता अनुभवता येत नाही.🙏🙏
@Ram-ic9vr3 ай бұрын
75 वर्ष झाले अझादी भेटून आणि अजून पण महाराष्ट्रात ही परिस्थिती हे पाहून खूप वाईट वाटतेय हे vedio जरा पुणे चे पालक मंत्री अजित पवार यांना दाखवा ........ हजार कोटी याला हजार कोटी त्याला आणि जनता उपाशी हे आज चे राजकारणी हेच महारष्ट्र चे दुर्दिवा 😢
@pravinshenavi43655 ай бұрын
माझ्या आईच्या मामांनी व्हेले तालुक्यातील पासली या गावी स्वतःचे हायस्कूल सुरू केले आहे. त्यामुळे मी पासली गाव व व्हेले तालुका आणि तिकडचा काही भाग बघितला आहे. आणि मी तिकडे राहिलेलो सुद्धा आहे. त्यामुळे मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. असेच व्हिडिओ बनवत रहा सर ❤❤
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@janardhanbadge16545 ай бұрын
काय बोलावे शब्द सुचत नाहीत शक्य असेल त्यांनी मदत करावी हे नम्र विनंती.
@ramdasbabar39845 ай бұрын
शासनान/ स्वयंसेवी संस्थानीे अशी गांवे निधी देऊन प्राधान्याने गांवांना सुविधा देणे गरजेचे आहेSpecially लोकप्रतिनीधी / अधिकारी .
@paayvata5 ай бұрын
हो, पण शाश्वत विकास होणे गरजेचे आहे निसर्ग राखून
@arungogawale9184Ай бұрын
अतिशय सुंदर चित्रीकरण वास्तव्य खुप भयानक आमच्या सातारा जिल्ह्यात सह्याद्री च्या कुशीत कारगाव हे गाव सर्व खोर्यात सर्वांत मोठे गाव होते आतां त्याचं गावची दयनीय अवस्था अशीच आहे गावात फक्त मोजून पाच ते सहा माणसे आहेत कोयनेच्या काठावर असलेल्या गावात आत्ता लाईट आलेली आहे जर गावात कोणी आजारी पडलं तर रात्रभर तशीच काढावी लागते झाडपाल्याच औषध शिवाय पर्याय नाही अजुन तिच परिस्थिती आहे पावसात तिन चार महीन्याच रेशनिग एकदाच भरून घ्यायला लागते अशी परिस्थिती आज सुध्दा अशीच आहे
@ViP_08-cp7cv5 ай бұрын
मुंबई-गोवा महामार्गावर पाली गावाच्या पुढेही खानू गाव आहे.हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात येते.
@sheetalsurve5185 ай бұрын
आमच्या गावात सुद्धा हीच अवस्था होत चालली आहे कधी गेलं तर माणसं दिसतच नाहीत
@dayanandkhandagale49875 ай бұрын
खरंच! हृदयस्पर्शी व्यथा मांडली आहे आपण😮😮❤❤
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SunitaKelkar-y8m4 ай бұрын
मलाही हे गाव पहिल्यांदाच समजलं कारण मी राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणं गावची ,4 थी पर्यंत मी वेल्ह्याच्या शाळेत शिकले.
@prakashmahajan9495 ай бұрын
मी, सुद्धा खानु येथे सन् 1978/79 मध्ये election duty साठी गेलो होतो. तेव्हा 198/200 वोटिंग होते... Panshet dam, मधुन लॉन्च ने गेलो होतो... एक सुंदर अनुभव.
@paayvata5 ай бұрын
🙏
@paayvata5 ай бұрын
एवढ्या वर्षानंतर ही आकडा आपल्या लक्षात आहे आणि गावही... सलाम आहे सर
@Anand64_nashik4 ай бұрын
हया वर्षी कोणी गेले का इलेक्शन ड्यूटी साठी .
@supriyashirsath17124 ай бұрын
तुमच्या एक एक शब्दाने मन अगदी भारावून गेले ❤😊 खूप छान_👌👌
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@namdeobhapkar30875 ай бұрын
तरूण पिढीने काही मोकळा वेळ /सुट्टी कालावधीत गावाकडे फेरफटका मारावे.काही वेळ तिथे रहावे .काय करता येईल यासाठी प्रयत्न करावा.
@SunilKamble-dr4tj5 ай бұрын
महेश भाऊ धन्यवाद अशी परिस्थिती दाखवून आपल्या लोकांना जाग गेले
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nileshkhambe24524 ай бұрын
खानु मधले गव्हाणे आमच्या वारंगी गावात स्थाईक झाले आहेत. अजूनही लग्न कार्यात त्यांच्या मूळ गावाचं नाव टाकतातच..... गाव खूप लांब राहिला असला तरी मन गावातच आहे..!!
@DeepakChavan-gt1ro4 ай бұрын
काय व्हिडीओ पहिला no one खूप मन हेलावून गेले. अतिशय सुंदर असे हे गाव, किती शांत झाले. काहीतर करा अन् गावात पाण्याची व्यवस्था करा. मी पुण्या जिल्हा तील सर्व पदाधिकारी अधिकारी एनजीओ नेते अश्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो की खानु गावाचा कायापालट करा.
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sanjayamane28175 ай бұрын
प्रेरणादायी जीवनकार्याचे दर्शन घेतले व मन विचारमग्न झाले.... धन्यवाद 🌹👌👍
@SharmilaMalwade5 ай бұрын
खुप बरं आणि मनमोकळ झाल बघून मला माझ्या अजी ची आठवण आली❤❤❤
@appasahebmengawade943310 күн бұрын
मी श्री.आप्पासाहेब बाबुराव मेंगावडे प्राथमिक शिक्षक म्हणून माझ्या सेवेची सुरुवात या खाणू गावाशेजारीच असणाऱ्या हारपूड ता. वेल्हे या गावात २३/११/१९९५ रोजी झाली आहे.
@राष्ट्रप्रथम-ढ4घ5 ай бұрын
खानु मधील गव्हाणे आणि गोरड कुटुंब अजून 4 घरे कोकणात रायगडच्या पायथ्याला असणाऱ्या आमच्या वारंगी गावात स्थायिक झाली आहेत.
@santoshmore4735 ай бұрын
मी ह्या गावी लहान पणी खूपदा गेलोय हे माझ्या आईचे गाव आहे
@dhaneshjarande11204 ай бұрын
कोणता तालुका दादा आणि गाव कोणते आहे हे
@Nilesh-l7e4 ай бұрын
BHAI, AAI CHE GAAV AHE TAR MAG HYA GAVASATHI KAHITARI KARA,TAR TUJHYA AAILA VADILANA KHUP BHARUN PAVLYA SARKHE HOIL. ANI GAVATIL MANSANA SUDDHA. FAKT 1CH SANGANE, GAAV JAPAA, MANASE JAPAA, ANI NAATI PAN JAPAA. JEEVAN SUKHAMAY HOIL.!! JAY RAM KRISHNA HARI !!
@OBC_fireBrand4 ай бұрын
@@dhaneshjarande1120 खानू ता. वेल्हे
@vishnutange11395 ай бұрын
आरोग्य सेवा किती तळागळात सेवा किती प्रतिकूल परिस्थितीत सेवा देतात. मनपूर्वक अभिनंदन
@sagarvhatkar73495 ай бұрын
तुमचा अभिनंदन करण्यात मोठा नाहीये पण जे का तुम्ही पोहोचतो का काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे अशाच गावांचे शोध करा आणि अधिक माहिती सांगा धन्यवाद.
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद🙏
@samirpatil30345 ай бұрын
19/05/2024 ला 12:12 मी हे बघता दादा आपन मला माझ बालपण आठवण करून दिल खरच खूप बर वाटल. खूप खूप धन्यवाद. बरच काही विसर पडला होता. वेळेवर जाग केले दादा 🙏🙏
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद
@shekharkhule98904 ай бұрын
महेशजी शहरात आम्ही राहणारे लोक किती कद्रु मनाचे असतात हेच त्या आजीनं आपुलकीने चार शब्द बोलुन दादांनी बसायला सतरंजी टाकून दिली आजोबांनी फणस आलाय घेऊन जा हे दाखवून दिले की पैसेवाले आणि श्रीमंत यांच्यातला फरक पाण्याची सोय नलावडे यांनी केलेल्यांची जाणीव तुम्ही हे सगळं वास्तव दाखवलंत धन्यवाद मित्रा ❤
@paayvata4 ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@yuvrajsuryvanshi31712 ай бұрын
मी खरचं भाऊक झालो ....ही पिढी संपल्यावर तिथे काय उरणार आहे माहित नाही पण शासनाने अश्या गावांचा विकास केला पाहिजे ......😢😢😢😢😢
@deorambhujbal4835 ай бұрын
आपण स्थानिक लोकप्रतिनिधी श्री नलावडे यांचेशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेणे आवश्यक वाटले ,त्यामुळे तेथील लोकांच्या समस्या चव्हाट्यावर येऊन त्याला वाचा फुटली असती। व शासनाचे लक्ष्य वेढण्या स मदत झाली असती असे वाटते।।
@ranjanavasave10845 ай бұрын
आमच्याकडे सातपुडा पर्वताच्या शिखरावर या बरं हीच गोष्ट दिसून येईल.मागास मागास सांगत मागेच ठेवले पण तेवढंच आनंद देणारी माणसं आहेत ही.कमी गरजा कमी साहित्य अगदी समाधानी जीवन आम्ही तर अगदी जवळून पाहिले आहे.शिक्षक असल्याने जवळून पाहता आले
@sheetaldarwatkar68885 ай бұрын
एप्रिल 2024 मध्ये मी ह्या गावांमध्ये गेले होते....श्री सत्य साई संस्थेतर्फे दरमहा ह्या गावात भाजी वाटप कार्यक्रम राबविला जातो. त्या निमित्त मी ही सर्व गावे बघितली आहेत...
@paayvata5 ай бұрын
चांगला उपक्रम राबवत आहात 🙏
@vishalkoditkar47765 ай бұрын
अतिशय दुर्गम भागात जाऊन तिथल्या माणसांची माहिती दिली त्यांचे रहाणीमान.व इतर अडचणी. लोकांच्या समोर आणल्या. धन्यवाद. छान विडिओ.
@paayvata5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pradeeptake48415 ай бұрын
प्रतेक ठिकाणी फिरताना माला मझ्या आज्जी चे बलपन दिसत् होते.❤
@rushadshamkuwar951919 күн бұрын
"जुन ते सोन" हा वीडियो बघुन आज हे सीद्ध झाले की माणुसकी आणि आपुलकी हि फकस्त जुण्या लोकांमधेच बघायला मीळते. हि पीढ़ी नष्ट होत चालली आहे, हे बघुन वाईट वाटते .
@prakashsaste645 ай бұрын
वीस वर्षे कशाला पाहिजेत शहरात आत्ताच माणसं पोळतायत, आताच लोकांना गावाची आठवण व्हायला लागली आहे,
@musaddiksande78225 ай бұрын
खानू या गावापासून कोकणातील कोणता तालुका किंवा गाव बाॕन्ड्रीवर आहे व किती कि.मि.आंतर असेल माहीती खुपच नैसर्गिक व प्रेरणादायी आहे बेस्ट व्हिडिओ
@paayvata5 ай бұрын
सांदोशी, रायगड जिल्हा धन्यवाद
@amitbarve1365 ай бұрын
माणसांची वस्ती नाही तरी लाइट पाणी याची सोय दिसत आहे. यांना शहरी भागात का हलवत नाहीत ? शहराजवळील सर्व भागात अनधिकृत वसाहती वाढत आहेत. पण अशा स्थानिकांना तिथे घरकुले बांधून खाली आणले तर ?
@vijaypowar52254 ай бұрын
आधी आम्हीही असे डोंगरात राहत होतो त्याची जुनी आठवण झाली. निसर्गातील जगणं फारच सुंदर असते. आजच्या या सिमेंटच्या जंगलात नको वाटत
@ashokkadam62725 ай бұрын
महेश साहेब प्रथम आपले आभारी राहीन. गरीब लोक आहेस. त्यांना काही मदत. पैसे दिले असते तर बरे झाले असते. खरच गावची आठवण येते. कृपया माझी विनंति लक्षात ठेवा.
@paayvata5 ай бұрын
सर त्याचे कारण description मध्ये विस्तृत पने सांगितले आहे 🙏
@sanjaybhikule42494 ай бұрын
आमचे मूळ गाव.. विहीर. तालुका वेल्हा. माझे पणजोबा /खापर पणजोबा.. तिथून रायगड पायथ्याशी.varangi..पाने... कावळे... बावले... *दापोली* गावात स्थलांतर झाले होते..
@dnyaneshwarchaudhari71935 ай бұрын
खरच दुर्दैव आहे.की एवढ्या सुंदर परीसराकडे शासनाचे लक्ष नाही.लोकांकडे नेत्यांचे लक्ष नाही.हे लोक बीचारे कसे जगतात.खरच सरकार यांच्याकडे लक्ष देतील का ?