Рет қаралды 672
नमस्कार मित्रांनो..🙏🏻
मागील भागात आपण बघितले की मी साढेसहा तासात पुण्याहून आंबेजोगाई मधे पोहोचलो होतो त्यामुळे मला असे वाटत होते की मी थेट योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन लगेचच पुण्याला जर निघालो तर मे साधारण रात्री १०:३० / ११:०० वाजे पर्यंत घरी जाऊ शकतो..
पण घरच्यांनी मला असे करण्यास नकार दिला आणि आज आंबेजोगाई मधे मुक्काम कर आणि सकाळी देवीचे दर्शन घेऊन पुण्याला निघावे असे सांगितले आणि मला ही त्यांचे हे म्हणणे पटले म्हणुन मी आंबेजोगाई मधे आज मुक्काम करण्याचे ठरवले.
मित्रांनो मी ह्या पूर्वी जेव्हा पण आंबेजोगाई मधे आलो होतो तेव्हा इथे अनेक हॉटेल आहेत, तिथे मुक्काम करायचो आणि सकाळी उठून योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन आणि पुढे परळी वैद्यनाथाचे दर्शन घेऊन मग पुण्याला निघायचो..
आज मात्र मी कोणत्या ही हॉटेल मध्ये राहायचे नाही असे ठरवले होते आणि म्हणूनच मी योगेश्वरी देवी मंदिराच्या अगदी जवळच असलेल्या श्री आंबेजोगाई भक्त निवास न्यास,पुणे आणि चित्तपावन ब्राम्हण संघ,मुबई, यांचे संयुक्त वद्यमाने सुरू असलेल्या भक्तनिवासात राहण्याची काही व्यवस्था होते का हे पाहणयासाठी गेलो.
मिञांनो ..ह्या भक्तनिवासात सहकुटुंब येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी प्राधान्य देतात व एकट्या येणाऱ्या भावकांसाठी राहण्याची परवानगी देत नाहीत हे आपण कृपया लक्षात घ्यावे
पण माझे नशीब जोरात होते आणि त्यांनी मला माझी सर्व माहिती विचारल्यावर मला एका दिवसा साठी राहण्याची परवानगी दिली,आणि त्यांचे शुल्क भरून झाल्यावर मला माझ्या खोलीची चावी देण्यात आली.
मंडळी जसे प्रत्येक भकनिवसाची ऐक नियमावली असते तशी इथे पण राहण्यासाठी काही नियम आहेत, इथे राहण्यासाठी परवानगी देणे अथवा नाकारणे हा सर्वस्व ह्या भक्तनिवास व्यवस्थापनाचा निर्णय असतो, मला माझ्या खोली दाखवण्यात आली आणि त्याच वेळेस इथे जेवणाची व्यवस्था आहे हे पण सांगण्यात आले,मला हे पण सांगितले गेले होते की इथे सकाळी ८:३० वाजता नाष्टा मिळतो,तसेच दुपारच्या वेळेत चहा किंवा कॉफी मिळते, आणि रात्री चे जेवण ही आपण आगाऊ सूचना दिल्यास ते ही मिळते
मग मी आधी माझ्या खोलीत गेलो, जी एका व्यक्तीसाठी तर खूपच मोठी होती आणि त्यामधे पंखा आणि एसी असे दोन्ही गोष्टी उपलब्ध होत्या,अंघोळीसाठी गरम पाणी पण होते आणि हे सगळे मला अगदी माफक दरात म्हणजेच १३००/- रुपयांमध्ये मिळाले , इथे जेवणाचे ताट १५०/- रुपये आहे आणि चहा १०/- असा दर आहे ,आणि ह्याचे पैसे आपल्याला वेगळे द्यावे लागतात.
मित्रानो..आता माझी राहण्याची इतकी छान व्यवस्था झाली असल्यामुळे मी लवकर तोंड हात पाय धुतले आणि जेवणाच्या स्थळी जाण्याची निघलो, जेवणाची व्यवस्था खालच्या मजल्यावर होती जिथे साधारण ४/५ टेबल मांडण्यात आली आहेत आणि इथे आपल्याला आपले ताट वाढून घ्यायचे असते self-service पद्धतीने.
जेवण खरेच खूप छान होते आणि मी पण पोटभर जेवण केले, आता मात्र मला बाहेर असलेल्या उन्हाची झळ लागायला लागली होती आणि म्हणून मी आता इतक्या उन्हात बाहेर पडायचे नाही हे ठरवले आणि माझ्या खोलीच्या दिशेने निघालो..
आपल्या खोलीत छान असा एसी आहे आणि आता आपण थोडा वेळ आराम करून संध्याकाळी उन्हे उतरल्यावर देवीचे दर्शन घायला जावे असे मे ठरवून माझ्या खोली आलो, एसी सुरू केला आणि जे झोपलो ते थेट संध्याकाळीच उठलो..मला इतकी छान आणि शांत झोप लागली होती की संध्याकाळी जेव्हा मला बायकोचा फोन आला तेव्हाच जाग आली..
मग काय... घरातल्या सगळ्यांशी बोलणे सुरू झाले ..पुणे ते आंबेजोगाई प्रवास कसा झाला..., ब्रेकफास्ट कुठे केला,काय खाल्ले,कधी पोहोचलो,उन्हाचा त्रास झाला की नाही यावर चर्चा झाली आणि हे सगळे होता होता रात्रीचे साढेआठ वाजले..
रोजच्या रात्रीच्या जेवणाची वेळ झाली असल्यामुळे मी पुन्हा माझ्या खोलीतून खाली उतरलो ते थेट जेवणाच्या ठिकाणी गेलो.खरे सांगायचे झाले तर मला रात्री साठी भूक अशी न्हवती तरी पण मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी बघुन मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि ताटात कढी खिचडी घेऊन त्यावर भरपूर तूप घेऊन सोबत लोणचे पापड घेतले आणि ते यथेच्छ जेवलो..
पोटभर जेवण झाल्यावर मी आता ऐक पाऊल पण चालण्याच्या मनस्थिती मधे नव्हतो म्हणून लिफ्ट ने माझ्या खोली पर्यन्त गेलो आणि जे झोपले ते थेट सकाळी सहा वाजताच उठलो..
मग प्रातर्विधी उरकून गरम पाण्याने अंघोळ केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो
भक्तनिवास ते मंदिर हे साधारण तीन ते पाच मिनिटांचे अंतर आहे
सकाळच्या वेळेत मंदिरात जाणे आणि तिथल्या प्रसन्न वातावरणात योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि तिचे आभार मानले...आणि मग माझा प्रवास सुरू झाला तो पुण्याच्या दिशेने..