Рет қаралды 139,063
सह्याद्रीतील ecosensitive zone मध्ये नद्यांचे उगम होतात. कातळ सड्यांवरून हे प्रवाह वाहत वाहत सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये उंचावरून कोसळतात धबा धबा...
गिरीचे मस्तकी गंगा कोठून चालली बळे धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे अशी पवित्र गंगेची उपमा रामदास स्वामींनी ह्या नदी उगमाना दिलेली आहे...
केवळ मजा म्हणून पर्यटन करायला येणाऱ्या राज्यातीलच लोकांकडून कोकण आणि सह्याद्रीतील अश्या इको सेन्सटिव्ह जागा गर्दीने आणि कचऱ्याने भरल्या जात आहेत...मान्सून म्हणजे केवळ पार्टी करण्याचा मोसम नसून सृष्टीचा निसर्ग सौंदर्याने नटण्याचा आणि जैव विविधतेने बहरण्याचा काळ आहे...आपल्या मजेसाठी निसर्ग चक्रात बाधा आणून इथे राहणाऱ्या स्थानिकांचे जीवन चक्रही आपण बिघडवत आहोत ह्यांचे भान प्रत्येक पर्यटकाला असायला हवे🙏